शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

रत्नागिरी आगाराकडून प्रवाशांची कुचेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:22 IST

एस्. टी. गाड्यांवर खडूचे फलक

 आॅनलाईन लोकमत/अरुण आडिवरेकर

रत्नागिरी, दि. २४ : ^^‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने प्रवाशांचीच कुचेष्टा मांडली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या गाड्यांवर सध्या खडूने लिहिलेले फलक पाहायला मिळत आहेत. हे फलक दूरवरून प्रवाशांना दिसत नसल्याने गाडी चुकण्याचे प्रकारही घडत आहेत.

रत्नागिरी विभागाच्या या कारभारानंतर आता राज्य परिवहन महामंडळाच्या भरतीत ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’ अशी अट आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातर्फे एस्. टी.कडे प्रवासी वळण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजना राबवताना प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना महामंडळ दिसत नाही.

नवनवीन योजना राबवताना प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे या कारभाराबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या शहरी वाहतुकीच्या गाड्यांवर लावण्यात येणाऱ्या फलकांची वानवा असल्याचे यातून दिसत आहे. या फलकांऐवजी गाड्यांवरील काचेवर खडूने फलक लिहिले जात आहेत. खडूने लिहिलेले हे फलक नीट दिसतही नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. गाडीसाठी बसथांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना हे फलक दिसत नसल्याने गाडी पुढ्यातून निघून गेल्यानंतरही गाडी कोणती आहे, हेच लक्षात येत नाही.

शहरातील बहुतांशी भागात जाणाऱ्या गाड्यांवर खडूने लिहिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गाड्यांचे फलक लिहिण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे निधीची कमतरता आहे का? असाच सवाल केला जात आहे. ऐन पावसाळ्यातच गाडीवर खडूने लिहिले जात असल्याने पाऊस पडल्यानंतर हा फलक पाण्यामुळे गायब होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही गाडी चुकल्यानंतर प्रवाशांना पुन्हा पुढच्या गाडीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एस्. टी.च्या शहरी वाहतूक गाड्यांवर लिहिण्यात येणारे हे खडूचे फलक पाहिल्यानंतर आता नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये चालक व वाहक पदांसाठी ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’, अशी अट महामंडळाने घातल्यास त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.