शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

रत्नागिरी आगाराकडून प्रवाशांची कुचेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:22 IST

एस्. टी. गाड्यांवर खडूचे फलक

 आॅनलाईन लोकमत/अरुण आडिवरेकर

रत्नागिरी, दि. २४ : ^^‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने प्रवाशांचीच कुचेष्टा मांडली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या गाड्यांवर सध्या खडूने लिहिलेले फलक पाहायला मिळत आहेत. हे फलक दूरवरून प्रवाशांना दिसत नसल्याने गाडी चुकण्याचे प्रकारही घडत आहेत.

रत्नागिरी विभागाच्या या कारभारानंतर आता राज्य परिवहन महामंडळाच्या भरतीत ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’ अशी अट आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातर्फे एस्. टी.कडे प्रवासी वळण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजना राबवताना प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना महामंडळ दिसत नाही.

नवनवीन योजना राबवताना प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे या कारभाराबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या शहरी वाहतुकीच्या गाड्यांवर लावण्यात येणाऱ्या फलकांची वानवा असल्याचे यातून दिसत आहे. या फलकांऐवजी गाड्यांवरील काचेवर खडूने फलक लिहिले जात आहेत. खडूने लिहिलेले हे फलक नीट दिसतही नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. गाडीसाठी बसथांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना हे फलक दिसत नसल्याने गाडी पुढ्यातून निघून गेल्यानंतरही गाडी कोणती आहे, हेच लक्षात येत नाही.

शहरातील बहुतांशी भागात जाणाऱ्या गाड्यांवर खडूने लिहिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गाड्यांचे फलक लिहिण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे निधीची कमतरता आहे का? असाच सवाल केला जात आहे. ऐन पावसाळ्यातच गाडीवर खडूने लिहिले जात असल्याने पाऊस पडल्यानंतर हा फलक पाण्यामुळे गायब होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही गाडी चुकल्यानंतर प्रवाशांना पुन्हा पुढच्या गाडीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एस्. टी.च्या शहरी वाहतूक गाड्यांवर लिहिण्यात येणारे हे खडूचे फलक पाहिल्यानंतर आता नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये चालक व वाहक पदांसाठी ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’, अशी अट महामंडळाने घातल्यास त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.