शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

चिपळूण एसटी बस स्थानकात प्रवाशांचा हंगामा

By संदीप बांद्रे | Updated: July 15, 2024 22:17 IST

संदीप बांद्रे / चिपळूण- मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बस पावसामुळे तब्बल तीन तास मार्गातच खोळंबल्याने येथील प्रवासी वैतागले आणि ...

संदीप बांद्रे / चिपळूण- मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बस पावसामुळे तब्बल तीन तास मार्गातच खोळंबल्याने येथील प्रवासी वैतागले आणि त्यांनी चक्क बस स्थानकातच सोमवारी रात्री ९.४५ च्या दरम्यान हंगामा घातला. अखेर या प्रवाशांना चिपळूण आगारातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर काहीसे तणावाचे बनलेले वातावरण शांत झाले.

मुंबईतील भिवंडी व नालासोपारा येथून रत्नागिरीकडे येणारी बस चिपळूण बस स्थानकात सायंकाळी ७ वाजेपर्यंत नेहमी पोहोचतात. त्यामुळे चिपळूण बस स्थानकातील प्रवासी या बसने नेहमी रत्नागिरीकडे जातात. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या बंद असल्याने एसटी बस सेवेवर अधिक ताण वाढला आहे.त्यासाठी चिपळूण आगारातून रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिवसभरात १५ जादा बस सोडण्यात आल्या. मात्र पावसामुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या देखील उशिराने धावत आहेत. भिवंडी व नालासोपाराहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसही प्रवासात खोळंबल्याने पुढील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्याशिवाय नेहमीच्या प्रवाशांसोबतच रेल्वेच्या प्रवाशांची ही भर पडल्याने बस स्थानकात मोठा गोंधळ निर्माण झाला. 

अखेर तीन तास होऊनही भिवंडी व नालासोपारा बस न आल्याने या प्रवाशांचा पारा आणखी वाढला. त्यामुळे बस स्थानकात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर चिपळूण आगारातून रत्नागिरी मार्गावर एसटी बस सुरू सोडून संबंधित प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.

टॅग्स :Chiplunचिपळुण