शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पंधरामाड धूप बंधारा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:37 IST

भागातील ४० कुटुंबीयांचे जीव मुठीत

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी शहरातील पंधरामाड भागातील सागरी धूप प्रतिबंधक बंधारा उधाण भरतीच्या तडाख्यात सापडून अधिकच कोसळला आहे. किनाऱ्याला धडक देणाऱ्या महाकाय सागरी लाटांमुळे धूपप्रतिबंधक बंधारा जागोजागी खचला आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडले आहे, यामुळे या भागातील ४० कुटुंबीयांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धूपबंधाऱ्याचे काम योग्यरित्या झालेले नाही. मिकरवाडा बंदराच्या सुरक्षिततेसाठी सागरात उभारण्यात आलेल्या वाय आकाराच्या ब्रेक वॉटर वॉलमुळेही पंधरामाड व मिऱ्या किनाऱ्याकडे पाण्याचा करंट वाढल्याने पंधरामाडसह मिऱ्या गावही सागरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे.

शहरातील पंधरामाड सागरी किनारा तसेच शहराबाहेरील मिऱ्या, जाकीमिऱ्या या गावांच्या सागरी किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून सागरी आक्रमण सुरू आहे. त्यामुळे या भागातील जमीन सागराने गिळंकृत केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही टप्प्यांमध्ये या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या बंधाऱ्यासाठी मोठा दगड वापरला जावा, तरच हा बंधारा सागरी लाटांच्या तडाख्याला तोंड देईल, अशी अट बंधारा उभारणाऱ्या ठेकेदाराला घालण्यात आली होती. त्याचे पालन झाले नसल्यानेही बंधारा ढासळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शनिवारीही उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने पंधरा माड येथील धूपप्रतिबंधक बंधारा खचून भगदाड पडले व दगड सागराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यानंतर रविवारी दुपारी आलेल्या अमावास्येच्या सागरी उधाणामुळे व महाकाय लाटांमुळे तर या धूप बंधाऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. अनेक ठिकाणी हा बंधारा खचून कोसळला आहे. त्यामुळे सागरी लाटा बंधाऱ्यावरून नागरी वस्तीत प्रवेश करू लागल्या आहेत.