शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

पंधरामाड धूप बंधारा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:37 IST

भागातील ४० कुटुंबीयांचे जीव मुठीत

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी शहरातील पंधरामाड भागातील सागरी धूप प्रतिबंधक बंधारा उधाण भरतीच्या तडाख्यात सापडून अधिकच कोसळला आहे. किनाऱ्याला धडक देणाऱ्या महाकाय सागरी लाटांमुळे धूपप्रतिबंधक बंधारा जागोजागी खचला आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडले आहे, यामुळे या भागातील ४० कुटुंबीयांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धूपबंधाऱ्याचे काम योग्यरित्या झालेले नाही. मिकरवाडा बंदराच्या सुरक्षिततेसाठी सागरात उभारण्यात आलेल्या वाय आकाराच्या ब्रेक वॉटर वॉलमुळेही पंधरामाड व मिऱ्या किनाऱ्याकडे पाण्याचा करंट वाढल्याने पंधरामाडसह मिऱ्या गावही सागरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे.

शहरातील पंधरामाड सागरी किनारा तसेच शहराबाहेरील मिऱ्या, जाकीमिऱ्या या गावांच्या सागरी किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून सागरी आक्रमण सुरू आहे. त्यामुळे या भागातील जमीन सागराने गिळंकृत केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही टप्प्यांमध्ये या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या बंधाऱ्यासाठी मोठा दगड वापरला जावा, तरच हा बंधारा सागरी लाटांच्या तडाख्याला तोंड देईल, अशी अट बंधारा उभारणाऱ्या ठेकेदाराला घालण्यात आली होती. त्याचे पालन झाले नसल्यानेही बंधारा ढासळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शनिवारीही उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने पंधरा माड येथील धूपप्रतिबंधक बंधारा खचून भगदाड पडले व दगड सागराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यानंतर रविवारी दुपारी आलेल्या अमावास्येच्या सागरी उधाणामुळे व महाकाय लाटांमुळे तर या धूप बंधाऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. अनेक ठिकाणी हा बंधारा खचून कोसळला आहे. त्यामुळे सागरी लाटा बंधाऱ्यावरून नागरी वस्तीत प्रवेश करू लागल्या आहेत.