शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

पाली बाजारपेठ १५ दिवस कडकडीत बंद ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

रत्नागिरी : येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ग्राम कृती दलाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू ...

रत्नागिरी : येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ग्राम कृती दलाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व प्रकारची दुकाने, विविध अस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच विठ्ठल गोविंद सावंत व श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ग्राम कृती दलाची तातडीची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. पाली पंचक्रोशीतील समाविष्ट सर्व गावांमधील लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच पालीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनांचे काटेकोर पालन करावे. त्यातून कोरोना रुग्णांची संख्या थांबवण्यास मदत होणार आहे, असे आवाहन पाली कृती दलातर्फे करण्यात आले आहे.

गावात कृती दलाने घेतलेले निर्णय

१) गावात विनाकारण फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी करण्यात येणार आहे.

२) ३ ते १५ मे २०२१ या काळात गावातील सर्व दुकाने पूर्णवेळ बंद असणार आहेत.

३) १५ मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या बघून ग्राम कृती दल १६ मेनंतर काय करायचे याचा निर्णय घेणार आहे.

४) बंद कालावधीत कोणतीही दुकाने उघडी आढळल्यास त्यांना ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

५) या कालावधीत दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेत्यांची दुकाने बंद राहतील. त्यांनी दुकाने उघडी ठेवल्यास त्यांना ५ हजार रूपये दंड केला जाईल.

६) मेडिकल दुकाने सकाळी ९ ते ११ व दुपारी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.