शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

पाली बाजारपेठ १५ दिवस कडकडीत बंद ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

रत्नागिरी : येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ग्राम कृती दलाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू ...

रत्नागिरी : येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ग्राम कृती दलाने शुक्रवारपासून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व प्रकारची दुकाने, विविध अस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच विठ्ठल गोविंद सावंत व श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ग्राम कृती दलाची तातडीची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. पाली पंचक्रोशीतील समाविष्ट सर्व गावांमधील लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच पालीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनांचे काटेकोर पालन करावे. त्यातून कोरोना रुग्णांची संख्या थांबवण्यास मदत होणार आहे, असे आवाहन पाली कृती दलातर्फे करण्यात आले आहे.

गावात कृती दलाने घेतलेले निर्णय

१) गावात विनाकारण फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी करण्यात येणार आहे.

२) ३ ते १५ मे २०२१ या काळात गावातील सर्व दुकाने पूर्णवेळ बंद असणार आहेत.

३) १५ मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या बघून ग्राम कृती दल १६ मेनंतर काय करायचे याचा निर्णय घेणार आहे.

४) बंद कालावधीत कोणतीही दुकाने उघडी आढळल्यास त्यांना ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

५) या कालावधीत दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेत्यांची दुकाने बंद राहतील. त्यांनी दुकाने उघडी ठेवल्यास त्यांना ५ हजार रूपये दंड केला जाईल.

६) मेडिकल दुकाने सकाळी ९ ते ११ व दुपारी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.