शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

पाली, लांजा, कणकवलीत उड्डाणपूल

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

महामार्ग चौपदरीकरण : कामाला गती मिळण्याची आशा

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करतानाच कमीत कमी लोक बाधित व्हावेत, यासाठी पाली, लांजा आणि कणकवली येथे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय व राज्याच्या बांधकाम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुरुप सह्याद्री या शासकीय निवासस्थानी खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दीर्घकाळापासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासकीय स्तरावर सर्व कामांना प्रारंभ होण्यासाठी गीतेंनी सूचना केली. तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या चौपदरीकरणासाठी महामार्गात येणाऱ्या निवासी वसाहती तसेच बाजारपेठा वाचवण्याच्या अनुषंगाने सांगोपांग चर्चा झाली.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाली, लांजा व सिंधुदुर्गातील कणकवली या महत्त्वपूर्ण बाजारपेठा या चौपदरीकरणातून वगळण्यासाठी मोठ्या स्वरुपाचे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामार्गादरम्यान कमीत कमी रहिवासी व व्यापारी बाधित होतील, याची काळजी घेताना जे रहिवासी व व्यापारी विस्थापित होतील, त्यांना केंद्राच्या नवीन धोरणानुसार मोबदला दिला जावा, अशी मागणी या बैठकीत विनायक राऊत यांनी यावेळी केली.त्याचबरोबर प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या व रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी हे काम एकाचवेळी ५ भागात चालू करावे, असा प्रस्ताव आहे. हे काम अधिकाधिक वेगात व कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी हे काम किमान १० ते १२ भागात एकाचवेळी सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना उपस्थित लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली. यावर चर्चा होऊन संबंधित यंत्रणेने त्वरित मान्यता दिली. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, बांधकाम खात्याचे अधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)