शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

पाली, लांजा, कणकवलीत उड्डाणपूल

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

महामार्ग चौपदरीकरण : कामाला गती मिळण्याची आशा

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करतानाच कमीत कमी लोक बाधित व्हावेत, यासाठी पाली, लांजा आणि कणकवली येथे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय व राज्याच्या बांधकाम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुरुप सह्याद्री या शासकीय निवासस्थानी खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दीर्घकाळापासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासकीय स्तरावर सर्व कामांना प्रारंभ होण्यासाठी गीतेंनी सूचना केली. तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या चौपदरीकरणासाठी महामार्गात येणाऱ्या निवासी वसाहती तसेच बाजारपेठा वाचवण्याच्या अनुषंगाने सांगोपांग चर्चा झाली.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाली, लांजा व सिंधुदुर्गातील कणकवली या महत्त्वपूर्ण बाजारपेठा या चौपदरीकरणातून वगळण्यासाठी मोठ्या स्वरुपाचे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामार्गादरम्यान कमीत कमी रहिवासी व व्यापारी बाधित होतील, याची काळजी घेताना जे रहिवासी व व्यापारी विस्थापित होतील, त्यांना केंद्राच्या नवीन धोरणानुसार मोबदला दिला जावा, अशी मागणी या बैठकीत विनायक राऊत यांनी यावेळी केली.त्याचबरोबर प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या व रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी हे काम एकाचवेळी ५ भागात चालू करावे, असा प्रस्ताव आहे. हे काम अधिकाधिक वेगात व कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी हे काम किमान १० ते १२ भागात एकाचवेळी सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना उपस्थित लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली. यावर चर्चा होऊन संबंधित यंत्रणेने त्वरित मान्यता दिली. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, बांधकाम खात्याचे अधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)