शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कृषी विद्यापीठाचे भातबियाणे शिल्लक

By admin | Updated: July 2, 2015 00:28 IST

अनुदान रद्द : शेतकऱ्यांनी फिरवली खरेदीकडे पाठ

शिवाजी गोरे -दापोली -कोकणातील भातशेती परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाताचे पीक घेणे बंद केले आहे. अनेक शेतकरी भातपीक घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून ७५ टक्के सबसिडी दिली जात होती. शेतकरी दरवर्षी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या भाताच्या बियाण्याची पेरणी करुन अधिक उत्पन्न घेत होता. परंतु यावर्षी सरकारने भात बियाण्यावरील अनुदान बंद केल्याने विद्यापीठाच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, चारही जिल्ह्यातील विक्री केंद्रात आज अखेर बियाणे शिल्लक आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून निर्माण केलेल्या बियाण्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे भातशेतीला चांगले दिवस येवू लागले होते. पारंपरिक बियाण्यांची पेरणी करून पीक घेणे बंद करुन शेतकरी विद्यापीठचे सुधारित बियाणं पेरून उत्पादन घेऊ लागला होता. भात बियाणं महाग असलं तरीही भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनंच मदतीचा हात दिला होता. त्यामुळे चांगल्या जातीचं महागड बियाणंसुद्धा शेतकरी खरेदी करत होता. सरकारी अनुदानामुळे कृषी विद्यापीठ भात बियाणं सहज उपलब्ध करून देत होतं. परंतु अनुदान बंद झाल्यामुळे सधन शेतकऱ्यांनी भात बियाणे रोखीत खरेदी केलं. परंतु गरीब शेतकऱ्याला महागडं बियाणं खरेदी करण्याची ऐपत नसल्याने त्यांनी नवीन बियाण्याकडे पाठ फिरवली आहे. सुमारे ६० टक्के शेतकऱ्यानी जुनेच बियाणं आपल्या शेतीत पेरल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. भात पिकाच्या उत्पन्नात घट होऊ शकते, असा दावा आता तज्ज्ञ मंडळी करु लागली आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाबीज कंपनीकडून ५ हजार क्विंटल भात बियाण्याची उचल केली. कृषी विद्यापीठाच्या बियाण्याला दरवर्षी शेतकऱ्याचा असलेला प्रतिसाद पाहून यावर्षी अधिकच बियाणे महाबीजकडून मागवण्यात आले. परंतु सरकारने अनुदान बंद केल्यामुळे कृषी विभाग व शेतकऱ्याकडून बियाण्यांची उचल कमी झाली.पेरणी होऊन रोपे लावणीला आली आहेत. तरीसुद्धा दरवर्षी मे महिन्यात संपणारे भात बियाणे विद्यापीठाच्या विक्री केंद्रात पडून आहे. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ७ बियाणे केंद्रात शेकडो क्विंटल बियाणे शिल्लक आहे. त्यामुळे एवढ्या बियाण्याचं करावं काय? असा प्रश्न विद्यापीठासमोर उभा आहे.उत्पन्नावर परिणाम होणार?सरकारने भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी अनुदान सुरु ठेवायला हवे होते. परंतु अनुदान बंद करुन कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. यामुळे शेतकऱ्याने गेल्या वर्षीच्या जुन्या बियाण्याची पेरणी केली असून, त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर्षी राज्याच्या भात उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दुसरीकडे कृषी विद्यापीठाकडे तयार असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.