शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

छाेटे जंगल निर्माण करून ‘ऑक्सिजन पार्क’ उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : काेराेनाच्या काळात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे़ पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे़ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : काेराेनाच्या काळात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे़ पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे़ त्यामुळे छोटे छोटे जंगल निर्माण करून त्याला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्यात येणार असल्याचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाइन परिषदेत ठरविण्यात आले आहे़

राज्यभरातील कृतीशील पर्यावरणप्रेमी शिक्षकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाइन परिषद आयोजित केली होती. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या प्रमुख प्रतिनिधींसह राज्य महिला सखी मंचच्या प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.

सुरुवातीला या मंडळाने सायरा एज्युकेशन पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण पीपीटी स्पर्धेत १०६ पर्यावरण पीपीटी आलेल्या होत्या. त्या स्पर्धेचा निकाल विशाल कांबळे यांनी आभासी वातावरणात स्क्रीनवर प्रमाणपत्र शेअर करून जाहीर केला. यात अनुक्रमे सुभाष नारकर पन्हाळा कोल्हापूर, कीर्ती मोरे भिवंडी ठाणे, वंदना कोरपे चिंचवड ठाणे हे विजेते ठरले. प्रदीप भाकरे कोपरगाव अहमदनगर आणि दत्ता लोकरे भिवंडी ठाणे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले.

यावेळी पर्यावरण मंडळाचे राज्य सचिव आणि कोकणातील लेखक धीरज वाटेकर यांनी ‘पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी कोणत्या क्षेत्रात कोणती झाडं लावावीत, याची संकलित केलेली माहिती महत्त्वाची आहे. नूतन बांदेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे त्यांनी कौतुक केले. धीरज वाटेकर यांनी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘इको सिस्टम रिस्टोरेशन’ असल्याचे सांगितले. आजूबाजूच्या परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, पुनर्निर्माण, पुनर्वसन करण्याचा विचार या मागे असल्याचे ते म्हणाले.