शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वेशीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ...

दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे असताना तालुक्यातील सडवली गावाने एकी दाखवत आतापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळल्याने कोरोनाला वेशीबाहेर ठेवले आहे.

पाण्यासाठी वणवण

साखरपा : संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. डोंगराळ भागात वसलेल्या वाड्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. आता टंचाई अधिकच वाढली आहे.

दुकानदार धास्तावले

रत्नागिरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ नंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काही दुकानदार उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने ग्राहकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक दुकानदार धास्तावले आहेत.

पावसाची शक्यता

रत्नागिरी : कोकणासह राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

रक्तदान शिबिर

आरवली : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवार दिनांक ११ मे रोजी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

ऑक्सिजनला मागणी

राजापूर : सध्या कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र खासगी तसेच शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

एस.टी. फेऱ्यांमध्ये कपात

गुहागर : येथील आगारातून पूर्वी दिवसाला अधिक फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता कोरोना काळात या आगारातून जिल्ह्यात दोन ठिकाणी केवळ आठच फेऱ्या सुरू आहेत. १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे एस.टी.ला भारमान नसल्याने आठच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.