शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वेशीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ...

दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे असताना तालुक्यातील सडवली गावाने एकी दाखवत आतापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळल्याने कोरोनाला वेशीबाहेर ठेवले आहे.

पाण्यासाठी वणवण

साखरपा : संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. डोंगराळ भागात वसलेल्या वाड्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. आता टंचाई अधिकच वाढली आहे.

दुकानदार धास्तावले

रत्नागिरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ नंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काही दुकानदार उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने ग्राहकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक दुकानदार धास्तावले आहेत.

पावसाची शक्यता

रत्नागिरी : कोकणासह राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

रक्तदान शिबिर

आरवली : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवार दिनांक ११ मे रोजी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

ऑक्सिजनला मागणी

राजापूर : सध्या कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र खासगी तसेच शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

एस.टी. फेऱ्यांमध्ये कपात

गुहागर : येथील आगारातून पूर्वी दिवसाला अधिक फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता कोरोना काळात या आगारातून जिल्ह्यात दोन ठिकाणी केवळ आठच फेऱ्या सुरू आहेत. १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे एस.टी.ला भारमान नसल्याने आठच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.