शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

...अन्यथा वस्तीची एस. टी. सेवा बंद होणार

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

निवास व शौचालय व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये एस. टी.ची रात्रीची सेवा बंद करण्याचा इशारा

अडरे : चिपळूण तालुक्यात निवास व शौचालय व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये एस. टी.ची रात्रीची सेवा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, चिपळूण आगारातर्फे देण्यात आला आहे. चालक व वाहकांसाठी निवास व शौचालय व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्याबाबत संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण २०३ गावात एस. टी. बसेस रात्रवस्तीला जात असून, अद्याप १५० गावांमध्ये निवास व शौचालय व्यवस्था नाही. अनेक गावे ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत निर्मल व हगणदारी मुक्त घोषित झाल्याने वाहक व चालकांना रात्री उघड्यावर प्रात:विधीसाठी जावे लागते. याबाबत संघटनेतर्फे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही झाली. शासनाने भारत स्वच्छता अभियान सुरु केले आहे. अशा परिस्थितीत चालक, वाहकांना निवास व शौचालय याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी व्यवस्था नसेल, अशा ठिकाणी रात्रवस्तीला जाण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामीण भागात निवास व शौचालय व्यवस्था होणे आवश्यक असून संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे चिपळूण विभागीय अध्यक्ष रवींद्र लवेकर यांनी दिले आहे. (वार्ताहर)