शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

केसरकरांच्या आदेशाला अक्षता

By admin | Updated: July 9, 2015 23:54 IST

महावितरण कंपनी : आदेश देऊनही वीजजोडणी देण्यास टाळाटाळ

शिरीष नाईक -कसई-दोडामार्ग येथील संजय खांबल हे १३ वर्षे अंधारात असल्याने त्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महावितरणच्या अधिकारी यांना दिले होते. मात्र, एक महिना उलटला तरी वीजजोडणी देण्यात आली नाही. यामुळे मंत्र्यांच्या आदेशालाही न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांची मनमानी वाढतच आहे. पालकमंत्री केसरकर यांनी वीज अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी होत आहे.कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील संजय खांबल यांच्या घरात १३ वर्षे वीज नाही. यामुळे ते अंधारात जीवन जगत आहेत. मुलांचे शिक्षण, घरकामे हे सारे दिव्याखालीच सुरू आहे. त्यामुळे खांबल कुटुंब अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने २१ मे रोजी प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचून सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्यांतून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, वीज जोडणीला विरोध करण्यात आल्याने अधिकारी हातावर हात ठेवून गप्प राहिले. त्यानंतर ५ जून रोजी दोडामार्ग येथे आमसभा झाली. या सभेमध्ये संजय खांबल यांनी याबाबत आवाज उठविला. १३ वर्षे आम्ही अंधारात आहोत, अधिकारी वीज जोडणी करत नाही, असे सांगितले. त्यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधितांना विचारले. आमसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व विरोधक असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना वीज जोडणीला विरोध नको, जर कोणी विरोध करत असेल तर पोलिसांचा बंदोबस्त घ्या आणि त्वरित वीज जोडणी द्या. असा विषय पुन्हा आपल्याकडे येता कामा नये, असे आदेश वीज अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. तरीही वीजजोडणी मिळालेली नाही.अधिकारी उद्धटपणे वागतातदरम्यान, या घटनेला महिना होऊनसुद्धा अद्यापपर्यंत वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री महोदयांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा गंभीर आरोप संजय खांबल यांनी केला आहे. यामुळे अधिकारी मनमानी कारभार करतात हे उघड झाले आहे. मंत्र्यांच्या आदेशाचे पालन न करता उलट हे अधिकारी उद्धटपणे वावरत आहेत. यावर पालकमंत्री केसरकर कोणती भूमिका घेणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.