शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

स्वतंत्र मंडणगड जिल्हा होण्याचा मार्ग मोकळा? - सरकारच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 12:53 IST

रत्नागिरी : चिपळूण ते माणगाव स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याचे मुख्यालय मंडणगड किंवा दापोली या ठिकाणी व्हावे, या मागणीच्या ...

ठळक मुद्दे - जिल्हा विभाजनातील अडथळा दूर

रत्नागिरी : चिपळूण ते माणगाव स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याचे मुख्यालय मंडणगड किंवा दापोली या ठिकाणी व्हावे, या मागणीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीला सन २०१४मध्ये प्रारंभ झाला होता. त्यानंतर ही कार्यवाही पूर्णपणे थंडावली होती. मात्र, आता राज्य शासनाने राज्यातील २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे संकेत दिल्याने आता रत्नागिरी जिल्हा विभाजनाच्या कार्यवाहीला गती मिळणार आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेडचा काही भाग रायगड जिल्ह्यात समाविष्ट करण्याचे विचाराधीन असून, नवीन जिल्ह्याचे ठिकाण मंडणगड किंवा महाड (जि. रायगड)चा विचार केला जाणार असल्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारंभ मंडणगड तालुक्यापासून होतो. संगमेश्वर आणि मंडणगड या तालुक्यांचा समावेश ग्रामीण क्षेत्रात होतो. त्यापैकी मंडणगड तालुका दुर्गम असल्याने या तालुक्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा विकास थांबला आहे. रत्नागिरी ते मंडणगड हे अंतर सुमारे १७० किलोमीटर इतके आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी पाच ते सहा तास वाहनाचा प्रवास करावा लागतो.

या तालुक्यातील ग्रामीण जनतेला तर शासकीय कामांसाठी येताना न पेलवणारा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तसेच शासकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर ते काम करून परत जाण्यासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो. त्यामुळे या तालुक्याच्या समस्यांचा विचार करून हा तालुका रायगड जिल्ह्याला जोडण्याचा निर्णयही मध्यंतरी विचाराधीन होता.या सर्व बाबींचा विचार करून २७ मे २०१४ रोजी झालेल्या मंडणगडच्या पंचायत समितीच्या बैठकीत चिपळूण ते माणगाव (जि. रायगड) असा स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याचे मुख्यालय मंडणगड या ठिकाणी व्हावे, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. जिल्हा विभाजन झाले तर चिपळूणसह खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यांना मध्यवर्ती जिल्ह्याचे ठिकाण दापोली किंवा मंडणगड ठरेल, असेही या ठरावात नमूद करण्यात आले होते. या ठरावाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून, दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लोकसंख्या, उद्योग, कृषी क्षेत्र, शैक्षणिक सुविधा आदींची माहिती मागविण्यात आली होती.

त्यादृष्टीने काही काळ कार्यवाही सुरू करण्यात आली होती. कार्यवाही सुरू होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप याबाबत जिल्हा प्रशासनाकडे काहीच माहितीच आलेली नाही. याविषयी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी सातत्याने स्मरणपत्राद्वारे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अजूनही ही माहिती जिल्हा प्रशासनाला मिळालेली नाही.आता राज्य सरकारने राज्यातील २२ नव्या जिल्ह्यांच्या आणि ४९ नव्या तालुक्यांच्या निर्मितीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मंडणगड हा स्वतंत्र जिल्ह्याचे विभाजन करून त्याला दापोली, खेड, हे तालुके जोडून तसेच रायगड जिल्ह्यातील काही तालुके जोडून नवीन जिल्हा अस्तित्त्वात येण्याची शक्यता आहे.सहा वर्षांपूर्वीचा प्रस्ताव२०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वाखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २२ नव्या जिल्ह्यांची आणि ४९ नव्या तालुक्यांची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यात मंडणगडचा समावेश आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजनचा प्रस्तावही या समितीने ठेवला होता. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याने मंडणगडसह रायगडमधील काही तालुके मिळून महाड स्वतंत्र जिल्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी