शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

रत्नागिरीत खुलेआम वाळूचोरी

By admin | Updated: August 11, 2015 00:08 IST

यंत्रणेचे दुर्लक्ष : दररोज शेकडो ब्रास सागरी वाळूचे बेकायदा उत्खनन

रत्नागिरी : जिल्ह्यात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. रत्नागिरीच्या भरारी पथकाकडून गेल्या दोन दिवसात चिपळूणच्या गोवळकोट खाडीतील वाळू चोरणाऱ्यांवर झालेल्या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांच्या काळात शेकडो ब्रास सागरी वाळूची चोरी राजरोस होत असूनही ती महसूल विभाग, भरारी पथकाला दिसू नये, याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून, चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराजवळच लागून असलेल्या पांढरा समुद्र येथील किनाऱ्यावरील वाळू खणून ती छोट्या वाहनांतून राजरोस नेली जाते, याकडे महसूल खात्याचे दुर्लक्ष असल्याचे व लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत असल्याचे वृत्त लोकमतने काही काळापूूर्वी दिले होते. त्यानंतर तहसीलदारांनी पांढरा समुद्र येथे कारवाई केली. मात्र, त्यानंतर ही मोहीम थंडावली. पुन्हा पांढरा समुद्र खणण्याचे काम अव्याहतपणे सुरू झाले आहे. पांढऱ्या समुद्रापासून जवळच असलेल्या पंधरामाड, मिऱ्या, जाकीमिऱ्या येथे सागरी आक्रमणामुळे धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागले आहेत. मात्र, पांढरा समुद्र येथील किनारा सातत्याने खणला जात असून, त्यामुळे सागराचे पाणी आत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी धोका निर्माण झाल्याचे सांगत भविष्यात येथेही धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा सागरी वाळूचे राजरोस होणारे उत्खनन व चोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई नेमकी कोणत्या कारणाने होत नाही, असा सवालही नागरिकांतून केला जात आहे. गोवळकोट येथे गेल्या दोन दिवसात रत्नागिरीच्या भरारी पथकाने वाळूमाफियांना दणका देणारी कारवाई केली आहे. अशीच कारवाई पांढरा समुद्र येथे कधी होणार असा सवाल केला जात आहे. या ठिकाणी दिवसा व रात्रीही छोट्या वाहनांमधून सागरी वाळू भरून ती विक्रीसाठी नेली जात आहे. वाहने किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी दगडी रस्ताही तयार करण्यात आला आहे. ही स्थिती असताना हा रस्ता उखडण्याची कारवाई शासकीय खात्याने का केली नाही, हा चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)ढिगारा पोखरलागेल्या दोन वर्षांपूर्वी मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करण्यात आला. या वाळूवजा गाळाचा ढिगारा पांढरा समुद्रकिनाऱ्यावरच करून ठेवण्यात आला आहे. त्या ढिगाऱ्यातील निम्मी वाळू मेरिटाईम बोर्डाला विकत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित निम्म्या ढिगाऱ्यालाही वाळूमाफियांनी पोखरले आहे. या ढिगाऱ्याशेजारीच असलेल्या वाळूच्या दुसऱ्या ढिगाऱ्यातही वाळू चोरीमुळे बोगदे तयार झाले आहेत. मिरकरवाडाच्या दिशेने किनाऱ्यावरील वाळूही खणल्याचे दिसून येत आहे. हे उत्खनन व वाळूचोरी सुरूच राहिल्यास काही काळाने पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरही करोडो रुपये खर्चून धूपबंधारा बांधावा लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.