शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक झाले असून, निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, मंदिरे खुली करण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे.

गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले, त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत शासकीय नियमांचे पालन करत मंदिरे खुली होती. मंदिरे खुली असल्याने मंदिर परिसरातील विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र, जेमतेम चार महिनेच भाविकांना थेट देवदर्शन घेता आले. त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये मंदिरे पुन्हा बंद झाल्यामुळे पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक संकटात सापडले. गतवर्षी आठ महिने आणि यावर्षी गेले तीन महिने या व्यावसायिकांना मंदिरे बंद असल्याची झळ सोसावी लागत आहे. अनेक कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरातील नित्य पूजा सुरु असून, अन्य धार्मिक विधी बंद असल्याने पुजारीसुध्दा आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

आता निर्बंध शिथील करतानाच विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, मंदिरे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे अजून किती दिवस कळसाचे दर्शन घ्यावे?

- शशिकांत देसाई, भाविक

अनलाॅकमुळे शिथिलता जारी करतानाच मंदिरे सुरू करण्यासाठीही परवानगी द्यावी. शासकीय नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्यात यावी, जेणेकरून भाविकांना दर्शन तरी सुलभ होईल. अद्याप किती दिवस दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- ऋतुजा नागवेकर, भाविक

गेल्यावर्षी आठ महिने व गेले सलग तीन महिने मंदिरे बंद आहेत. मंदिरातील नित्य पूजा सुरू असली तरी भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांच्या माध्यमातून होणारी पूजा, अभिषेक व अन्य धार्मिक विधी बंद आहेत. मंदिरे बंद असल्याने पुजारीही घरीच आहेत. यातून अनेक कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- अमित घनवटकर, पुजारी

मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ थांबली आहे. भाविक नसल्यामुळे व्यवसायही कोलमडले आहेत. व्यवसायातील गुंतवणूक, विजेची बिले, देखभाल-दुरूस्ती खर्च, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज व त्याचे हप्ते यांची सांगड घालणे अवघड झाले आहे.

- अशोक काळोखे, हाॅटेल व्यावसायिक, गणपतीपुळे

कोरोनामुळे गतवर्षीपासून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने शासकीय निर्बंधांत मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांची उपासमार टळेल.

- दिनेश ठावरे, नारळ, शहाळी विक्रेता, गणपतीपुळे