शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक झाले असून, निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, मंदिरे खुली करण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे.

गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले, त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत शासकीय नियमांचे पालन करत मंदिरे खुली होती. मंदिरे खुली असल्याने मंदिर परिसरातील विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र, जेमतेम चार महिनेच भाविकांना थेट देवदर्शन घेता आले. त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये मंदिरे पुन्हा बंद झाल्यामुळे पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक संकटात सापडले. गतवर्षी आठ महिने आणि यावर्षी गेले तीन महिने या व्यावसायिकांना मंदिरे बंद असल्याची झळ सोसावी लागत आहे. अनेक कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरातील नित्य पूजा सुरु असून, अन्य धार्मिक विधी बंद असल्याने पुजारीसुध्दा आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

आता निर्बंध शिथील करतानाच विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, मंदिरे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे अजून किती दिवस कळसाचे दर्शन घ्यावे?

- शशिकांत देसाई, भाविक

अनलाॅकमुळे शिथिलता जारी करतानाच मंदिरे सुरू करण्यासाठीही परवानगी द्यावी. शासकीय नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्यात यावी, जेणेकरून भाविकांना दर्शन तरी सुलभ होईल. अद्याप किती दिवस दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- ऋतुजा नागवेकर, भाविक

गेल्यावर्षी आठ महिने व गेले सलग तीन महिने मंदिरे बंद आहेत. मंदिरातील नित्य पूजा सुरू असली तरी भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांच्या माध्यमातून होणारी पूजा, अभिषेक व अन्य धार्मिक विधी बंद आहेत. मंदिरे बंद असल्याने पुजारीही घरीच आहेत. यातून अनेक कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- अमित घनवटकर, पुजारी

मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ थांबली आहे. भाविक नसल्यामुळे व्यवसायही कोलमडले आहेत. व्यवसायातील गुंतवणूक, विजेची बिले, देखभाल-दुरूस्ती खर्च, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज व त्याचे हप्ते यांची सांगड घालणे अवघड झाले आहे.

- अशोक काळोखे, हाॅटेल व्यावसायिक, गणपतीपुळे

कोरोनामुळे गतवर्षीपासून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने शासकीय निर्बंधांत मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांची उपासमार टळेल.

- दिनेश ठावरे, नारळ, शहाळी विक्रेता, गणपतीपुळे