शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक झाले असून, निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, मंदिरे खुली करण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे.

गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले, त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत शासकीय नियमांचे पालन करत मंदिरे खुली होती. मंदिरे खुली असल्याने मंदिर परिसरातील विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र, जेमतेम चार महिनेच भाविकांना थेट देवदर्शन घेता आले. त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये मंदिरे पुन्हा बंद झाल्यामुळे पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक संकटात सापडले. गतवर्षी आठ महिने आणि यावर्षी गेले तीन महिने या व्यावसायिकांना मंदिरे बंद असल्याची झळ सोसावी लागत आहे. अनेक कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरातील नित्य पूजा सुरु असून, अन्य धार्मिक विधी बंद असल्याने पुजारीसुध्दा आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

आता निर्बंध शिथील करतानाच विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, मंदिरे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे अजून किती दिवस कळसाचे दर्शन घ्यावे?

- शशिकांत देसाई, भाविक

अनलाॅकमुळे शिथिलता जारी करतानाच मंदिरे सुरू करण्यासाठीही परवानगी द्यावी. शासकीय नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्यात यावी, जेणेकरून भाविकांना दर्शन तरी सुलभ होईल. अद्याप किती दिवस दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- ऋतुजा नागवेकर, भाविक

गेल्यावर्षी आठ महिने व गेले सलग तीन महिने मंदिरे बंद आहेत. मंदिरातील नित्य पूजा सुरू असली तरी भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांच्या माध्यमातून होणारी पूजा, अभिषेक व अन्य धार्मिक विधी बंद आहेत. मंदिरे बंद असल्याने पुजारीही घरीच आहेत. यातून अनेक कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- अमित घनवटकर, पुजारी

मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ थांबली आहे. भाविक नसल्यामुळे व्यवसायही कोलमडले आहेत. व्यवसायातील गुंतवणूक, विजेची बिले, देखभाल-दुरूस्ती खर्च, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज व त्याचे हप्ते यांची सांगड घालणे अवघड झाले आहे.

- अशोक काळोखे, हाॅटेल व्यावसायिक, गणपतीपुळे

कोरोनामुळे गतवर्षीपासून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने शासकीय निर्बंधांत मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांची उपासमार टळेल.

- दिनेश ठावरे, नारळ, शहाळी विक्रेता, गणपतीपुळे