शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

दापोलीत केवळ ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

By admin | Updated: October 21, 2016 00:59 IST

नगरपंचायत निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आतापासूनच चर्चा

दापोली : तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे ७ ऐवजी ६ गट झाले आहेत. यापैकी केवळ दोन गटांमध्ये आरक्षणात बदल झाल्याने सध्यातरी सर्व पक्ष व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दापोली नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असल्याने सध्यातरी सर्वांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. राजेंद्र फणसे यांनीदेखील जिल्हा परिषदेकरिता दुसरा मतदार संघ न पाहता, पंचायत समितीकरिता प्रयत्न करू, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांना दुसरा मतदार संघ शोधावा लागणार नाही. यामुळे त्यांचे पुनर्वसन पक्षाला करावे लागणार नाही. पालगड जिल्हा परिषद गटात राजेंद्र फणसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनीदेखील मोठ्या मनाने पक्ष देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पालगड गटात सध्यातरी शिवसेना ‘सेफ’ असल्याची चर्चा आहे. मात्र, केळशी येथे पक्ष कुणाला उमेदवारी देतो, यावर तेथील गणिते अवलंबून आहेत. अडीअडचणीला धावून जात मदत करणारा अशी भगवान घाडगे यांची परिसरात ख्याती असल्याने शिवसेना नेतृत्व भगवान घाडगे याच्या ‘फेवर’मधील उमेदवार केळशीत देते की धोका पत्करून अन्य उमेदवार देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. याआधी तालुक्यात केळशी, पालगड, हर्णै, टाळसुरे, उन्हवरे, दाभोळ, जालगाव असे ७ जिल्हा परिषद गट होते. यापैकी हर्णै व जालगाव गट वगळता सर्वच गटांवर सेनेचे वर्चस्व होते. गेल्या निवडणुकीत हर्णै गटावर राष्ट्रवादीच्या सुजाता तांबे या निवडून आल्या होत्या तर जालगाव गटावर प्राबल्य असणारे भाजपचे केदार साठे यांच्या नेतृत्वाखाली जान्हवी धाडवे या निवडून आल्या होत्या. त्यांनी तत्कालिक राष्ट्रवादीचे नेते किशोर देसाई यांच्या पत्नीचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सध्या सेना-भाजपचे राज्य व स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवर एकमेकांशी जुळताना दिसून येत नाही. दोन्ही पक्षांकडून स्वबळाचे नारे देण्यात आले आहेत. त्यात किशोर देसाई हे पुन्हा ‘सेना’वासी झाले आहेत. यामुळे आता कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. तसेच काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष अ‍ॅड. विकास मेहतादेखील याच मतदारसंघातील आहेत. किशोर देसाई हे सेनेत गेल्याने आमदार संजय कदम यांना कार्यकर्त्यांची घरे शोधावी लागणार आहेत. यामुळे जर आघाडी झाली तरच येथील आघाडीच्या उमेदवाराला संधी मिळेल, अशी चर्चा ऐकू येत आहे. नवीन रचनेनुसार दाभोळपेक्षा बुरोंडीची लोकसंख्या वाढल्याने दाभोळ गटाचे नामकरण बुरोंडी जिल्हा परिषद गट असे झाले आहे. यामुळे माजी पंचायत समिती सभापती स्मीता जावकर यांना बुरोंडी येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असोंडची लोकसंख्याही उन्हवरेहून अधिक झाल्याने उन्हवरे गटाचे नामकरण असोंड जिल्हा परिषद गट असे झाले आहे. यामुळे तालुक्यात आता केवळ ६ जिल्हा परिषद गट अस्तित्वात राहीले आहेत. पूर्वीच्या उन्हवरे आणि आत्ताच्या असोंड जिल्हा परिषद गटातील विनायक गायकवाड यांना आरक्षणाचा फटका बसला असून, येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने त्यांचा येथून पत्ता कट झाला आहे. अन्य गटात या आरक्षणाने फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची सावध भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)