शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांची जिल्हा प्रवेशद्वारावर केवळ नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा ...

राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरटीपीसीआर चाचणी ऐवजी ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्याची मागणी केली. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून मुंबईतून येणाऱ्या चाकरमन्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांना चाचणीशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे सांगितले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान आरटीपीसीआर अहवाल येणास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केली तसेच कोविडशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस थांबावे लागत आहे. सद्य:स्थिती पाहता दुसरा डोस लगेच उपलब्ध होत नाहीत. कोविडशिल्ड पहिला डोस झालेल्या प्रवाशांची जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी ॲँटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशीही मागणी आमदार साळवी यांनी केली हाेती.

जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांनी या चर्चेनंतर जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असेल तर किंवा कोविडशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन पहिला डोस झाला असेल तर त्या प्रवाशांची जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करणात येईल, असे सांगितले. त्यांच्या गावाच्या ग्रामकृती दलाकडून आवश्यकतेनुसार तपासणी केली जाईल, असे सांगितले. या निर्णयामुळे गावी येणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.