शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

...तरच रिफायनरीला मान्यता देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:29 IST

आमदार राजन साळवी यांची माहिती

आॅनलाईन लोकमत

राजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : नाणार परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा पर्यावरणाला धोका होणार नाही, या हमीसहित समस्त प्रकल्पग्रस्तांच्या आग्रही मागण्यांचा विचार झाला तरंच या प्रकल्पाला सहकार्य करु, अशी भूमिका नाणारमधील जनहित संघर्ष समितीने घेतली असून, आपल्या काही मागण्यांबाबत सोमवार, दिनांक २४ जुलै रोजी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा असा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार परिसरात शासनाने मंजूर केला असून, एकूण १४ गावातील १५ हजार एकर जागा त्यासाठी संपादीत करण्यात आली आहे. स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला असून, संघर्षाला सुरुवातदेखील झाली आहे. प्रकल्पाला असलेल्या विरोधाची धार आणखी वाढवण्यासाठी नाणार परिसरातील १४ गावांनी एकत्र येत जनहित संघर्ष समितीची स्थापना केली आहे.

नाणारचे रामकृष्ण पेडणेकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या माध्यमातून संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला असतानाच आता अचानक संघर्ष समितीने सबुरीचे धोरण स्वीकारताना जर शासन नियोजित रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका होणार नाही, अशी ठोस हमी देणार असेल तर प्रकल्पाबाबत पाठिंबा देण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.