शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

...तरच रिफायनरीला मान्यता देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:29 IST

आमदार राजन साळवी यांची माहिती

आॅनलाईन लोकमत

राजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : नाणार परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा पर्यावरणाला धोका होणार नाही, या हमीसहित समस्त प्रकल्पग्रस्तांच्या आग्रही मागण्यांचा विचार झाला तरंच या प्रकल्पाला सहकार्य करु, अशी भूमिका नाणारमधील जनहित संघर्ष समितीने घेतली असून, आपल्या काही मागण्यांबाबत सोमवार, दिनांक २४ जुलै रोजी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा असा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार परिसरात शासनाने मंजूर केला असून, एकूण १४ गावातील १५ हजार एकर जागा त्यासाठी संपादीत करण्यात आली आहे. स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला असून, संघर्षाला सुरुवातदेखील झाली आहे. प्रकल्पाला असलेल्या विरोधाची धार आणखी वाढवण्यासाठी नाणार परिसरातील १४ गावांनी एकत्र येत जनहित संघर्ष समितीची स्थापना केली आहे.

नाणारचे रामकृष्ण पेडणेकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या माध्यमातून संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला असतानाच आता अचानक संघर्ष समितीने सबुरीचे धोरण स्वीकारताना जर शासन नियोजित रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका होणार नाही, अशी ठोस हमी देणार असेल तर प्रकल्पाबाबत पाठिंबा देण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.