शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

...तरच रिफायनरीला मान्यता देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:29 IST

आमदार राजन साळवी यांची माहिती

आॅनलाईन लोकमत

राजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : नाणार परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा पर्यावरणाला धोका होणार नाही, या हमीसहित समस्त प्रकल्पग्रस्तांच्या आग्रही मागण्यांचा विचार झाला तरंच या प्रकल्पाला सहकार्य करु, अशी भूमिका नाणारमधील जनहित संघर्ष समितीने घेतली असून, आपल्या काही मागण्यांबाबत सोमवार, दिनांक २४ जुलै रोजी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा असा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार परिसरात शासनाने मंजूर केला असून, एकूण १४ गावातील १५ हजार एकर जागा त्यासाठी संपादीत करण्यात आली आहे. स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला असून, संघर्षाला सुरुवातदेखील झाली आहे. प्रकल्पाला असलेल्या विरोधाची धार आणखी वाढवण्यासाठी नाणार परिसरातील १४ गावांनी एकत्र येत जनहित संघर्ष समितीची स्थापना केली आहे.

नाणारचे रामकृष्ण पेडणेकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या माध्यमातून संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला असतानाच आता अचानक संघर्ष समितीने सबुरीचे धोरण स्वीकारताना जर शासन नियोजित रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका होणार नाही, अशी ठोस हमी देणार असेल तर प्रकल्पाबाबत पाठिंबा देण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.