शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक दृष्टीकोनच फसव्या विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल : हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

रत्नागिरी : मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम ...

रत्नागिरी : मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम विज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि सध्याच्या कोविडच्या महामारी काळात ही भीती प्रत्येकाच्या मनात आज ठाण मांडून बसलेली असल्याने आज फसव्या विज्ञानाच्या दाव्यांना लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसत आहेत, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आयोजित केलेल्या छदमविज्ञानविरोधी जनजागरण मोहिमेतील ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या व्याख्यानात डॉ. हमीद दाभोलकर यांनी 'फसव्या विज्ञानाला लोक का भुलतात?, या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या स्वत:च्या क्षमतेने जे काही आपल्याला मिळू शकते, त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळविण्याची आसक्ती, आपली मुले नेहमीच सर्वांपुढे राहावी, ही पालकांची अति महत्त्वाकांक्षा हे मानवी मनाचे गुणधर्मही छदम विज्ञानाच्या वाढीला कसे कारणीभूत ठरतात, हे सांगताना त्यांनी हातावरील रेषा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची बौद्धिक क्षमता वाढविणारी ‘डेक्तोलोग्राफी’ किंवा सध्या जोरात असलेल्या ‘मिड्ब्रेन अक्टिव्हेशन’चे उदाहरण दिले. अनेक आजार हे दीर्घ मुदतीचे व कधीच बरे न होणारे असतात. त्यामुळे आपल्याला असे आजार झाले आहेत हे न स्वीकारण्याची मानसिकता असते. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती किवा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित संज्ञा घेऊन चुटकीसरशी बरे करणारे हे फसवे उपचार मानवी मनाला लगेच भुलवतात. असे सांगून त्यांनी चुंबक चिकित्सा, सेरोजेम, प्राणिक हिलिंग, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर वैगेरे प्रकारचे उपचार छदमविज्ञानी असल्याचे सांगितले. हे बाजारावर अवलंबून असणारे छदमविज्ञानाचे प्रकार असल्याने मागणी तसा पुरवठा तत्त्वाने यात सतत भरच पडत राहाते व नव्या प्रकारांची निर्मिती होत राहाते, असेही ते म्हणाले.

धर्म आणि छदमविज्ञान यांची अभद्र युती असल्याचे सांगून ते म्हणाले, एकाच वेळेला आपण प्रागतिक आहोत, आधुनिक आहोत, पण त्याचवेळेस आम्ही आमच्या प्राचीन, मूळ संस्कृतीशी कसे जोडले गेले आहोत, हे सिद्ध करण्याच्या मानसिक गरजेतून ही युती घडून येते, याचा प्रत्यय आज आपण घेतच आहोत. डॉक्टर, अनेक वैज्ञानिक ‘गोविज्ञाना’ला बळी पडताना दिसत आहेत. ‘प्राचीन काळात आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होत होती हे गणपतीच्या उदाहरणावरून सिद्ध होते’, या पंतप्रधानांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी केलेला दावाही या मानसिकतेतून केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. छदम विज्ञानाला बळी पडणाऱ्यांची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलता येणार नाही, असे सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे’, हे नरेंद्र दाभोलकरांचे वाक्य उदरुधत करत ते म्हणाले, “हे वाक्य जितके अंधश्रद्धा निर्मूलनाला लागू आहे तितकेच छदमविज्ञानालादेखील लागू आहे. ते सामोरे ठेवतच आगामी कालखंडात छदमविज्ञानाच्या विरोधी संघर्षाला अंनिस कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्याख्यानाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या गाण्याने झाली. सूत्रसंचालन फारूक गवंडी यांनी केले, तर आभार डॉ. अशोक कदम यांनी मानले. तीन दिवसांच्या छदम विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमालेचा समारोप अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केला.