शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वैज्ञानिक दृष्टीकोनच फसव्या विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल : हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

रत्नागिरी : मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम ...

रत्नागिरी : मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम विज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि सध्याच्या कोविडच्या महामारी काळात ही भीती प्रत्येकाच्या मनात आज ठाण मांडून बसलेली असल्याने आज फसव्या विज्ञानाच्या दाव्यांना लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसत आहेत, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आयोजित केलेल्या छदमविज्ञानविरोधी जनजागरण मोहिमेतील ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या व्याख्यानात डॉ. हमीद दाभोलकर यांनी 'फसव्या विज्ञानाला लोक का भुलतात?, या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या स्वत:च्या क्षमतेने जे काही आपल्याला मिळू शकते, त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळविण्याची आसक्ती, आपली मुले नेहमीच सर्वांपुढे राहावी, ही पालकांची अति महत्त्वाकांक्षा हे मानवी मनाचे गुणधर्मही छदम विज्ञानाच्या वाढीला कसे कारणीभूत ठरतात, हे सांगताना त्यांनी हातावरील रेषा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची बौद्धिक क्षमता वाढविणारी ‘डेक्तोलोग्राफी’ किंवा सध्या जोरात असलेल्या ‘मिड्ब्रेन अक्टिव्हेशन’चे उदाहरण दिले. अनेक आजार हे दीर्घ मुदतीचे व कधीच बरे न होणारे असतात. त्यामुळे आपल्याला असे आजार झाले आहेत हे न स्वीकारण्याची मानसिकता असते. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती किवा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित संज्ञा घेऊन चुटकीसरशी बरे करणारे हे फसवे उपचार मानवी मनाला लगेच भुलवतात. असे सांगून त्यांनी चुंबक चिकित्सा, सेरोजेम, प्राणिक हिलिंग, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर वैगेरे प्रकारचे उपचार छदमविज्ञानी असल्याचे सांगितले. हे बाजारावर अवलंबून असणारे छदमविज्ञानाचे प्रकार असल्याने मागणी तसा पुरवठा तत्त्वाने यात सतत भरच पडत राहाते व नव्या प्रकारांची निर्मिती होत राहाते, असेही ते म्हणाले.

धर्म आणि छदमविज्ञान यांची अभद्र युती असल्याचे सांगून ते म्हणाले, एकाच वेळेला आपण प्रागतिक आहोत, आधुनिक आहोत, पण त्याचवेळेस आम्ही आमच्या प्राचीन, मूळ संस्कृतीशी कसे जोडले गेले आहोत, हे सिद्ध करण्याच्या मानसिक गरजेतून ही युती घडून येते, याचा प्रत्यय आज आपण घेतच आहोत. डॉक्टर, अनेक वैज्ञानिक ‘गोविज्ञाना’ला बळी पडताना दिसत आहेत. ‘प्राचीन काळात आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होत होती हे गणपतीच्या उदाहरणावरून सिद्ध होते’, या पंतप्रधानांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी केलेला दावाही या मानसिकतेतून केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. छदम विज्ञानाला बळी पडणाऱ्यांची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलता येणार नाही, असे सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे’, हे नरेंद्र दाभोलकरांचे वाक्य उदरुधत करत ते म्हणाले, “हे वाक्य जितके अंधश्रद्धा निर्मूलनाला लागू आहे तितकेच छदमविज्ञानालादेखील लागू आहे. ते सामोरे ठेवतच आगामी कालखंडात छदमविज्ञानाच्या विरोधी संघर्षाला अंनिस कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्याख्यानाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या गाण्याने झाली. सूत्रसंचालन फारूक गवंडी यांनी केले, तर आभार डॉ. अशोक कदम यांनी मानले. तीन दिवसांच्या छदम विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमालेचा समारोप अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केला.