शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

समिती त्रयस्थ राहिली तरच मोहीमेला भविष्य

By admin | Updated: August 23, 2015 23:33 IST

तंटामुक्त मोहीम : मंडलनिहाय तंटे सोडवणे आवश्यक

सुभाष कदम ल्ल चिपळूण महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीतील राजकीय हस्तक्षेप कमी झाला. गावगुंडी कारभारावर टाच आली. पोलीसपाटील, पोलीस कर्मचारी, तलाठी व इतर अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केले व त्रयस्थपणे निर्णय घेतले तरच भविष्यात ही मोहीम टिकणार आहे. अन्यथा शासनाला ही मोहीम गुंडाळावी लागेल. महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम यशस्वी होण्यासाठी समितीची रचना व निर्मिती करतानाच काटेकोरपणे पावले उचलायला हवीत. ग्रामसभेत ज्याला अध्यक्ष केले जाते, त्याचा पूर्वेतिहास व पार्श्वभूमी तपासायला हवी. अनेकवेळा गावात धाकदपटशहा करणारा किंवा मनमानी करणारा तर काही वेळा गावाने ओवाळून टाकलेला सदस्यही अध्यक्ष होतो. या मंडळीला पार्श्वभूमीच नसल्याने अध्यक्षपदाच्या नावाखाली त्यांचे इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष असते. त्यामुळे ते न्याय काय देणार? हाही प्रश्न आहे. अनेकवेळा गावातील चौकट आपला मर्जीतील अध्यक्ष लादते. त्याने काहीही केले नाही तरी वर्षानुवर्षे त्याच व्यक्तीला पुन्हा पुन्हा संधी दिली जाते. गावातील हुशार किंवा प्रतिष्ठित असणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीला समितीपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे समितीच्या रचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. काही गावात तर मतदानाचा हक्क नसणारी व्यक्तीही अध्यक्ष झालेली आहे. ही स्थिती बदलणे गरजेचे आहे. शासन निर्णयाप्रमाणे समितीची रचना काटेकोरपणे करायला हवी. अनेक गावात ग्रामसभेला येण्याबाबत ग्रामस्थांची उदासीनता असते. त्यामुळे जे १० ते १२ ग्रामस्थ उपस्थित असतात तेच आपल्या मर्जीनुसार समितीची रचना करतात. त्यामुळे योग्य लोकांना संधी मिळत नाही. त्यासाठी सर्वांनी ग्रामसभेला उपस्थित राहून आपले अधिकार समजून घ्यायला हवेत. अनेकवेळा तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपले नक्की अधिकार काय, याचेही आकलन नसते. तसे त्यांना कोणी मार्गदर्शन किंवा प्रशिक्षितही करत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या कामाबद्दल माहिती नसते. समितीच्या सभाही फार कमी होतात. एखाद्याने तक्रार अर्ज दिला तर गावकीच्या बैठकीप्रमाणे त्याचा कीस काढला जातो. त्यातून योग्य निर्णय होतच नाही. त्यामुळे तक्रारदारही नाराज होतो. तंटामुक्त समितीच्या बैठकीला पोलीस कर्मचारी, तलाठी, महसूलचे अधिकारी अनेकवेळा अनुपस्थित राहतात. त्यामुळे समितीच्या सदस्यांना योग्य तांत्रिक माहिती मिळत नाही. अनेकवेळा महसूली प्रश्नांबाबत गुंते वाढत जातात. महसूली तंट्यांमुळे जिल्ह्यातील अनेक गावे अद्याप तंटामुक्त झालेली नाहीत. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन मंडलनिहाय तंटे सोडविले तर या तंट्यांवर नियंत्रण येईल व गावे तंटामुक्त होतील.