शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

जिल्ह्यात धावल्या केवळ ३४५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे ...

रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने गाड्यांना भारमान कमी हाेते. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नामध्येही मोठी घट झाली आहे. इतरवेळी जिल्ह्यात एस.टी.च्या ४२०० फेऱ्या होतात. त्यातून ५० लाखांचे उत्पन्न मिळते.

जिल्ह्यात संचारबंदीमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, शाळा, महाविद्यालय तसेच संचारबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. गुरुवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने एस.टी.च्या केवळ ३४५ फेऱ्या साेडण्यात आल्या. या गाड्या दिवसभरात २९,८१६ किलोमीटर धावल्या. त्यातून ७,४५,४०० एवढे उत्पन्न मिळाले.

दापोली आगारातून २४, खेड ३३, चिपळूण ५४, गुहागर ३४, रत्नागिरी ३४, देवरूख ८, लांजा ८६, राजापूर ५०, मंडणगड २२ आगारातून फेऱ्या सुटल्या. रत्नागिरी शहरात मात्र शहर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती संचारबंदीमुळे आणखीनच खालावणार आहे. जानेवारी महिन्यापासून एस.टी. महामंडळाच्या गाड्यांचे वेळापत्रक रुळावर येत होते. मात्र, १५ एप्रिलपासून सुरू झालेल्या संचारबंदीमुळे त्याला खीळ बसली आहे.