शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जिल्ह्यात धावल्या केवळ ३४५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे ...

रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने गाड्यांना भारमान कमी हाेते. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नामध्येही मोठी घट झाली आहे. इतरवेळी जिल्ह्यात एस.टी.च्या ४२०० फेऱ्या होतात. त्यातून ५० लाखांचे उत्पन्न मिळते.

जिल्ह्यात संचारबंदीमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, शाळा, महाविद्यालय तसेच संचारबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. गुरुवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने एस.टी.च्या केवळ ३४५ फेऱ्या साेडण्यात आल्या. या गाड्या दिवसभरात २९,८१६ किलोमीटर धावल्या. त्यातून ७,४५,४०० एवढे उत्पन्न मिळाले.

दापोली आगारातून २४, खेड ३३, चिपळूण ५४, गुहागर ३४, रत्नागिरी ३४, देवरूख ८, लांजा ८६, राजापूर ५०, मंडणगड २२ आगारातून फेऱ्या सुटल्या. रत्नागिरी शहरात मात्र शहर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती संचारबंदीमुळे आणखीनच खालावणार आहे. जानेवारी महिन्यापासून एस.टी. महामंडळाच्या गाड्यांचे वेळापत्रक रुळावर येत होते. मात्र, १५ एप्रिलपासून सुरू झालेल्या संचारबंदीमुळे त्याला खीळ बसली आहे.