शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

जिल्ह्यात धावल्या केवळ ३४५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे ...

रत्नागिरी : संचारबंदीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ९ आगारातून एकूण ३४५ एस.टी. गाड्या सुटल्या. संचारबंदीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने गाड्यांना भारमान कमी हाेते. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नामध्येही मोठी घट झाली आहे. इतरवेळी जिल्ह्यात एस.टी.च्या ४२०० फेऱ्या होतात. त्यातून ५० लाखांचे उत्पन्न मिळते.

जिल्ह्यात संचारबंदीमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, शाळा, महाविद्यालय तसेच संचारबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. गुरुवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने एस.टी.च्या केवळ ३४५ फेऱ्या साेडण्यात आल्या. या गाड्या दिवसभरात २९,८१६ किलोमीटर धावल्या. त्यातून ७,४५,४०० एवढे उत्पन्न मिळाले.

दापोली आगारातून २४, खेड ३३, चिपळूण ५४, गुहागर ३४, रत्नागिरी ३४, देवरूख ८, लांजा ८६, राजापूर ५०, मंडणगड २२ आगारातून फेऱ्या सुटल्या. रत्नागिरी शहरात मात्र शहर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती संचारबंदीमुळे आणखीनच खालावणार आहे. जानेवारी महिन्यापासून एस.टी. महामंडळाच्या गाड्यांचे वेळापत्रक रुळावर येत होते. मात्र, १५ एप्रिलपासून सुरू झालेल्या संचारबंदीमुळे त्याला खीळ बसली आहे.