शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

प्रधानमंत्री घरकुलाचा लाभ फक्त २३ जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

चिपळूण : कूळ वहिवाट अंतर्गत शहरात बहुतांश ठिकाणी जागा-जमीन असल्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभ घेण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. ...

चिपळूण : कूळ वहिवाट अंतर्गत शहरात बहुतांश ठिकाणी जागा-जमीन असल्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभ घेण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे चार वर्षांत या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या १४८ प्रस्तावांपैकी अवघ्या २३ कुटुंबीयांना लाभ घेता आला आहे. अन्य प्रस्ताव शासनाच्या एजन्सीने नाकारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी झालेल्या नगर परिषद सभेत पुढे आला.

याविषयी नागरिकांच्या प्रश्न व शंकांना नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याने त्याचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा व कूळ प्रश्नांविषयी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी नगर परिषद बांधकाम समितीचे सभापती मनोज शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध मुद्यांवर निर्णय होण्यासाठी विशेष सभेची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी या सभेचे आयोजन केले होते.

यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कुटुंबीयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगर अभियंता २०१७ पासून ही योजना शहरात कार्यरत असून आतापर्यंत ५०० हून अधिक सदनिकाधारकांनी सबसिडीचा लाभ घेतला आहे. तसेच १४८ घरकुलांचे प्रस्ताव सादर केले गेले. यासाठी शासनाची के. पी. आय. टी. ही एजन्सी काम करीत असून त्यांनी घरकुलाचे आतापर्यंत २३ प्रस्ताव मंजूर केले, तर उर्वरित नाकारले. त्यामध्ये कुळांच्या जमिनी हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट केले. यावर नगरसेवक अविनाश केळसकर यांनी अजूनही संबंधित नागरिक प्रतीक्षेत आहेत. त्यांना प्रस्ताव नाकारल्याची कल्पनाच नाही. त्यासाठी ते नगरसेवकांना विचारणा करू लागले आहेत. त्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्यांना पुरेशी माहिती द्यावी. लोकांची घरे पडायला आली आहेत, असे स्पष्ट केले.

यानंतर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच कुळांच्या प्रश्नांविषयी ठराव मांडल्यास तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे सांगितले. त्यानुसार ठराव करण्यात आला.

त्यानंतर ‘घर तेथे शौचालय’ या योजनेचा लाभ घेण्यात आला. यावेळी आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांनी सांगितले की, आतापर्यंत ३४६ प्रस्तावांपैकी ३१२ जणांनी लाभ घेतला असून, १९ कामे अपूर्ण आहेत. तसेच या कामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी पुरेसा असल्याचे स्पष्ट केले. याविषयीही सभागृहात गदारोळ झाला. अनेकांना कुळाच्या जमिनी व भाऊबंदकीमुळे लाभ घेता येत नाही. तेव्हा प्रशासनाने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यासाठी शौचालयाबाबत शहरात सर्वेक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला.