शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या ११ टक्के व्यक्तींचीच चाचणी ; ०.२ टक्के पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात ...

रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला तर ४२ हजार ३७४ जण कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात दाखल झाले होते. उर्वरितांकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ११ टक्के व्यक्तींचीच कोरोना चाचणी करावी लागली. यापैकी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ३४ टक्के चाचणी करूनच जिल्ह्यात दाखल झाले.

गेल्यावर्षी प्रमाणे यंदा गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात आली होती. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणल्यास अथवा ७२ तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणावा अथवा गावात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, असे आदेश काढले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत सुरू होती. जिल्ह्यात येण्यासाठी चार तपास नाके निश्चित करण्यात आले होते. याठिकाणी एसटी बसेस, खासगी गाड्या आणि रेल्वे गाड्यांमधून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची पूर्ण माहिती घेण्यात येत होती.

ही माहिती प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत ग्राम तसेच शहरी कृती दलांकडे पाठविण्यात येत होती. यात ज्यांची कोरोना चाचणी झालेली नाही, किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते, अशांची आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन चाचणी करून घेण्याची जबाबदारी या कृती दलांकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून अशा व्यक्तींची चाचणी करण्यात येत होती.

जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेला चाकरमान्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध मार्गाने दाखल झालेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांची कोरोना चाचणी करावी लागली. यापैकी केवळ ३५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यापैकी आरटीपीसीआर चाचणीत ४ आणि ॲंटिजन चाचणीत ३१ जण पाॅझिटिव्ह आले. तर ४२ हजार ३७४ जण येतानाच कोरोना चाचणी करून आले होते. तर उर्वरित ५५ टक्के लोकांकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र होते.

........

- ५ ते १९ या कालावधीत जिल्ह्यात आलेल्यांची संख्या : १,२३,५१२

- कोरोना चाचणी करून आलेले : ४२,३७४

आरटीपीसीआर : १२,९६४, ॲंटिजन : २९,४१०

- गावी आल्यावर चाचणी केलेले : १३,६१२

आरटीपीसीआर : १३०३, ॲंटिजन : १२३०९

- पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या : ३५

आरटीपीसीआर : ४, ॲंटिजन : ३१

- कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले : ६७,५२६