शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या ११ टक्के व्यक्तींचीच चाचणी ; ०.२ टक्के पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात ...

रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला तर ४२ हजार ३७४ जण कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात दाखल झाले होते. उर्वरितांकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ११ टक्के व्यक्तींचीच कोरोना चाचणी करावी लागली. यापैकी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ३४ टक्के चाचणी करूनच जिल्ह्यात दाखल झाले.

गेल्यावर्षी प्रमाणे यंदा गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात आली होती. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणल्यास अथवा ७२ तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणावा अथवा गावात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, असे आदेश काढले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत सुरू होती. जिल्ह्यात येण्यासाठी चार तपास नाके निश्चित करण्यात आले होते. याठिकाणी एसटी बसेस, खासगी गाड्या आणि रेल्वे गाड्यांमधून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची पूर्ण माहिती घेण्यात येत होती.

ही माहिती प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत ग्राम तसेच शहरी कृती दलांकडे पाठविण्यात येत होती. यात ज्यांची कोरोना चाचणी झालेली नाही, किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते, अशांची आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन चाचणी करून घेण्याची जबाबदारी या कृती दलांकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून अशा व्यक्तींची चाचणी करण्यात येत होती.

जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेला चाकरमान्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध मार्गाने दाखल झालेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांची कोरोना चाचणी करावी लागली. यापैकी केवळ ३५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यापैकी आरटीपीसीआर चाचणीत ४ आणि ॲंटिजन चाचणीत ३१ जण पाॅझिटिव्ह आले. तर ४२ हजार ३७४ जण येतानाच कोरोना चाचणी करून आले होते. तर उर्वरित ५५ टक्के लोकांकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र होते.

........

- ५ ते १९ या कालावधीत जिल्ह्यात आलेल्यांची संख्या : १,२३,५१२

- कोरोना चाचणी करून आलेले : ४२,३७४

आरटीपीसीआर : १२,९६४, ॲंटिजन : २९,४१०

- गावी आल्यावर चाचणी केलेले : १३,६१२

आरटीपीसीआर : १३०३, ॲंटिजन : १२३०९

- पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या : ३५

आरटीपीसीआर : ४, ॲंटिजन : ३१

- कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले : ६७,५२६