शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च, मोबाईल, इंटरनेटची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संक्रमण वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना संक्रमण वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने शासनमान्य व खासगी शाळांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे. शाळा बंद असल्याने मुले घरी असली तरी ऑनलाईन अध्यापनासाठी मोबाईल, टॅब, लॅपटाॅप व त्यासाठी लागणारी इंटरनेट सेवा यांमुळे शिक्षण खर्चिक बनले असून, पालकांना मात्र आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

ग्रामीण भागात नेटवर्क समस्या सातत्याने भेडसावत असल्याने दरमहा ठरावीक रकमेचे रिचार्ज करावे लागते. मात्र नेटवर्कच गायब असल्याने रिचार्ज वाया जात आहे. के.जी. ते पी.जी.पर्यंतचे अध्यापन ऑनलाईन आहे. एका घरात जर दोन किंवा तीन अपत्ये असतील व ती भिन्न वर्गांत शिकत असतील तर पालकांना मोबाईलसह इंटरनेटचा खर्च वाढला आहे. मोबाईलचा डाटा पुरत नसल्याने वायफाय सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्जसह वायफायसाठी वेगळे रिचार्ज करावे लागत आहे. मोठ्या वर्गातील मुलांना शाळा-महाविद्यालयांसह खासगी क्लास लावावे लागल्याने लॅपटाॅपसह पुरेसा डाटा उपलब्ध व्हावा, यासाठी वायफाय सेवा घ्यावी लागते. नोकरदार पालक, शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले असतील तर कुटुंबाला दरमहा दीड ते दोन हजार रुपये इंटरनेट, मोबाईल रिचार्जसाठी खर्च करावे लागत आहेत.

अभ्यासासाठी मोबाईल मुलांच्या हातात आला आहे. शाळेचा तास संपला तरी मुले मोबाईलवर गेम खेळण्यात, व्हिडिओ पाहण्यात व्यस्त राहतात. त्यामुळे ठरावीक रकमेच्या रिजार्चमुळे दररोजचा डाटा ठरलेला असतो. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होत असल्याने रिजार्चसाठी जास्तीचा खर्च वाढल्याने शिक्षण खर्चिक झाले आहे.

- स्वरूप पाटील, पालक.

n गतवर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन अध्यापन असल्याने अनेक पालकांना मोबाईल, टॅब, लॅपटाॅप खरेदी करावे लागले आहेत.

n ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने रिचार्जची रक्कम वाया जात आहे.

n दोन, तीन मुले असतील तर पुरेशा इंटरनेट डाटासाठी वायफाय सेवा घ्यावी लागत आहे. अनेक वेळा इंटरनेट सेवाही कोलमडत असल्याने मुलांचे नुकसान होते.

n शाळेचे तास संपल्यानंतर अनेक मुले व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे यांमध्ये मोबाईल डाटा वाया घालवीत आहेत. मुलांना वाढत्या खर्चाचे गणित कळत नसल्याने पालकांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

कोरोनामुळे घरातून अध्यापन सुरू असले तरी माझ्या दोन मुलांचे वर्ग वेगळे आहेत. मात्र वेळ एकच असल्याने मोबाईल खरेदी करावा लागला. शिकवणीचे वर्ग ऑनलाईनच सुरू आहेत. त्यामुळे ठरावीक रकमेचे रिचार्ज मारले तर डाटा पुरत नसल्याने वायफाय सेवा घेतली आहे. मुले घरातून अध्यापन करीत असली तरी शाळेची फी भरावीच लागते, इंटरनेटसाठीचाही खर्च वाढला आहे.

- जयदीप विचारे, पालक

बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन अध्यापनाचा स्वीकार करावा लागला असला तरी मुलांना आकलन कितपत होत आहे, हा एक प्रश्न आहे. मुलांच्या वर्तनात बदल झाला असून हट्टीपणा, चिडचिडेपणा वाढला आहे. आभासी मित्र वाढले असून जग इंटरनेटमुळे जवळ आले आहे. तुलनेने आठवी ते दहावीच्या मुलांचे प्रश्न वाढले आहेत. वाईट किंवा आकर्षणाकडे झुकत आहेत का, याबाबत पालकांनी दक्ष राहणे गरजे आहे. हे टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन मुलांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.

- डाॅ. सचिन सारोळकर, मानसोपचारतज्ज्ञ