शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

कांद्याने मारले...तरी भाज्यांनी तारले

By admin | Updated: August 23, 2015 00:41 IST

बजेट कोलमडलेले : भाज्या स्वस्त झाल्यामुळे महिला सुखावल्या

रत्नागिरी : कांद्याच्या दराने उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींना बजेट जुळविणे अवघड बनले आहे. मात्र त्याचवेळी भाज्यांचे दर खालावले असल्याने महिलावर्ग सुखावला आहे. रत्नागिरीतील नियमित बाजाराबरोबरच आठवडा बाजारातही कांदा ७० रूपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याप्रमाणे लसणीचे दरही वधारले आहेत. १२० ते १६० रूपये किलो दराने लसूण विकण्यात येत आहे. अर्थात बटाटा मात्र २० रूपये किलो दरावर स्थिर आहे. पावसामुळे कांद्याचे पीक वाया गेल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच दरात मोठी वाढ झाली आहे. कांदा वधारला असला तरी भाज्यांचे दर मात्र खालावले आहेत. भाज्यांची आवकही वाढली आहे. बाजारात मटार मुबलक स्वरूपात विक्रीस उपलब्ध आहे. श्रावणामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. गावठी भाज्याही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. गावठी भेंडी, दोडकी, पडवळ, भोपळा, काकडीदेखील बाजारात येऊ लागले आहे. भेंडी १० रूपयाला तीन जुड्या तर पडवळ दोडकी १० ते १५ रूपये प्रति नग दराने विकण्यात येत आहेत. याशिवाय काकडी २० रूपये किलो असली तरी मोठ्या काकड्या २० ते ४० रूपये प्रति नग विकण्यात येत आहेत. चिबूड ४० ते ६० रूपये दराने विकण्यात येत आहे. कापलेल्या भोपळ्याच्या शेडीची १० रूपये दराने विक्री सुरू आहे. मका १० ते १५ रूपये प्रति नग तर ओल्या भुईमुगाच्या शेंगा ४० ते ५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. कोथींबीर जुडी १० ते १५, मेथी, पालक, मुळा, शेपू, माठ, कांदापात, चवळी, मोहरी, आंबाडीची जुडी ७ ते १० रूपये दराने विकण्यात येत आहेत. श्रावण असल्याने अळुवडीची, हळदीची पानेही विक्रीस उपलब्ध आहेत. बाजारात फळांची आवकही वाढली आहे. सिमला सफरचंद, छोट्या आकारातील सफरचंद मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. ओला खजूर पॅकींग ७० ते ९० रूपये, केळी ४० ते ६० रूपये डझन, दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)