शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

वन्यप्राण्याचे हल्ले; रत्नागिरी जिल्ह्यात जखमींना मिळाली 'इतक्या' कोटीची भरपाई

By संदीप बांद्रे | Updated: December 6, 2024 18:16 IST

संदीप बांद्रे चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा ...

संदीप बांद्रेचिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला. तसेच १४ जण गंभीर जखमी, तर एकजण किरकोळ जखमी झाला. यातील मृतांच्या नातेवाइकांना आतापर्यंत ९८ लाख १५ हजार ४४५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. बिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड या वन्यप्राण्यांच्या व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र रानगाव, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यात सह्याद्री खोऱ्याच्या पायथ्याला असलेल्या गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली कायम दिसून येतात. विशेषत: बिबट्या, रानडुक्कर, रानगवा, माकड या प्राण्यांचा संचार अधिक वाढला आहे. यामध्ये एखाद्यावेळी मानवी हस्तक्षेप घडल्यास त्यामध्ये वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्याचे प्रकार घडतात.बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ कोंबडी, कुत्री खाण्याच्या उद्देशाने होत असल्याने त्यातून काहींवर हल्ल्याचे प्रकार घडले आहेत.मात्र बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असले तरी त्यात कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्याउलट रानगवा, रानडुक्कर, अस्वल यांच्या हल्ल्यात काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०२२-२३ मध्ये सतीश शांताराम जाधव (फुरूस), भिकाजी राघू माडवकर (माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (तळसर, चिपळूण) यांच्यावरही रानगव्याने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. अरुण रेडीज यांचा रानडुकराच्या हल्ल्यात (चांदेराई, रत्नागिरी) मृत्यू झाला होता. त्यातील काहींना २० लाख तर काहींना १५ लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली होती. या व्यतिरिक्त गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना १० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.

सह्याद्री खोऱ्यातील तळसर चिपळूण, पातेपिलवलीतर्फे वेळंब, शेवरवाडी नांदगाव, खानू नवीवाडी लांजा, तसेच फुरूस, पन्हाळकाजी दापोली, चिंचघर खेड, चांदेराई रत्नागिरी, दोडवली गुहागर, ताडील दापोली, साखरपा संगमेश्वर, पाथरट रत्नागिरी आदी ठिकाणी वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

वन्यप्राण्यांकडून मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय सहजासहजी हल्ला होत नाही. तरीदेखील काही गावांत वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसून आल्या, तर तत्काळ वन विभागाशी संपर्क साधवा. तसेच वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १९२६ हा चोवीस तास कार्यरत असलेल्या सेवेची ग्रामस्थांनी मदत घ्यावी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी यंत्रणा दाखल केली जाईल. - गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग