शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवायला हवी, शरद पवार यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 21:44 IST

वादळामुळे घरे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत पूर्ण कोलमडून गेल्याने नवीन लागवड करून उत्पन्न मिळण्यास आणखी सात-आठ वर्षे जातील.

दापोली - निसर्ग चक्रीवादळामुळे मंडणगड आणि दापोली तालुक्यात घरांचे आणि बागायतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायत लागती असल्याने झालेली हानी खूप मोठी आहे. त्यामुळे आता शेतकरी, बागायतदारांना उभे करायचे असेल तर रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्याची जुनी योजना परत राबवायला हवी, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आपण राज्य सरकारला तशी सूचना करणार असल्याचेही ते म्हणाले.आधी मंडणगड आणि नंतर दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला शरद पवार यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम उपस्थित होते. मंगळवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर बुधवारी सकाळी शरद पवार रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनंी वेळास, केळशी, मांदिवली, बाणकोट, हर्णै येथे भेट दिली. तेथील नुकसानग्रस्तांशी चर्चा केली.या पाहणीनंतर दापोली येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, वादळामुळे घरे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत पूर्ण कोलमडून गेल्याने नवीन लागवड करून उत्पन्न मिळण्यास आणखी सात-आठ वर्षे जातील. पण नवीन लागवड करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्याची आर्थिक क्षमताही या वादळाने राहिलेली नाही. त्यामुळे लागवडीसह तीन वर्षे शेतकरी, बागायतदारांना मदत होत राहील अशी फळबाग लागवडीची जुनी रोजगार हमी योजना राबवणे गरजेचे आहे. हा पर्याय आपण राज्य सरकारला सुचवणार आहोत.जिल्ह्यातील मासेमारी आणि पर्यटन क्षेत्राचेही वादळामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याचाही विचार राज्य सरकार करेल, असे त्यांनी सांगितले.आज विशेष बैठककोकणात झालेल्या नुकसानाबाबत गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक तातडीची बैठक घेणार आहेत. कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले. गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवरगतवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूर आला, तेव्हा राज्य सरकारने निकषात बदल करून नुकसान भरपाई दिली. याहीवेळी निकषात बदल करून कोकणवासियांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ