शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

कोरोनाबाबत अधिकारीच बेफिकीर, जिल्ह्याबाहेर मनमानीपणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:08 IST

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाबाबत अधिकारीच बेफिकीर, जिल्ह्याबाहेर मनमानीपणे प्रवासजिल्ह्यात आल्यावर तपासणी नाहीच, तपासणीसाठी गेलेल्या पथकांवर आसूड

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्याचे अतिशय अवघड असे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता १४९९पर्यंत पोहोचली आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यात स्थानिकांची संख्याच अधिक असल्याने जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दहशतीखाली नागरिक वावरत आहेत. त्यातच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही आता ४९ वर पोहोचली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणताना आरोग्य यंत्रणा बेजार होत आहे. डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी अथक लढा सुरू आहे.जिल्हा कोरोना संकटातून जात असताना खुद्द प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. काही अधिकारी रत्नागिरीतून अन्य जिल्ह्यांमध्ये जात आहेत व पुन्हा परतत आहेत. मात्र, कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा त्यांना हेतुपुरस्सर विसर पडलेला दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक अधिकारी असे परतले असून, स्वत: विलगीकरणात न राहता कार्यालयात येत आहेत.हे अधिकारी दौरे करून आल्यानंतर थेट कार्यालयात येत असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाबाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात येत आहे.

मात्र, या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी हे नियम नाहीत का, असे नागरिकांकडून विचारले जात आहे. काही अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही हिणकस वागणूक दिल्याची माहिती मिळत आहे.अधिकाऱ्यांची विनापास फिरती?सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, हे अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून विनापास किंवा विनापरवानगी प्रवास करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह त्यांचे वाहनचालक बाधित होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी