शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

कोरोनाबाबत अधिकारीच बेफिकीर, जिल्ह्याबाहेर मनमानीपणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:08 IST

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाबाबत अधिकारीच बेफिकीर, जिल्ह्याबाहेर मनमानीपणे प्रवासजिल्ह्यात आल्यावर तपासणी नाहीच, तपासणीसाठी गेलेल्या पथकांवर आसूड

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्याचे अतिशय अवघड असे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता १४९९पर्यंत पोहोचली आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यात स्थानिकांची संख्याच अधिक असल्याने जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दहशतीखाली नागरिक वावरत आहेत. त्यातच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही आता ४९ वर पोहोचली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणताना आरोग्य यंत्रणा बेजार होत आहे. डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी अथक लढा सुरू आहे.जिल्हा कोरोना संकटातून जात असताना खुद्द प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. काही अधिकारी रत्नागिरीतून अन्य जिल्ह्यांमध्ये जात आहेत व पुन्हा परतत आहेत. मात्र, कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा त्यांना हेतुपुरस्सर विसर पडलेला दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक अधिकारी असे परतले असून, स्वत: विलगीकरणात न राहता कार्यालयात येत आहेत.हे अधिकारी दौरे करून आल्यानंतर थेट कार्यालयात येत असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाबाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात येत आहे.

मात्र, या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी हे नियम नाहीत का, असे नागरिकांकडून विचारले जात आहे. काही अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही हिणकस वागणूक दिल्याची माहिती मिळत आहे.अधिकाऱ्यांची विनापास फिरती?सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, हे अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून विनापास किंवा विनापरवानगी प्रवास करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह त्यांचे वाहनचालक बाधित होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी