शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोरोनाबाबत अधिकारीच बेफिकीर, जिल्ह्याबाहेर मनमानीपणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:08 IST

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाबाबत अधिकारीच बेफिकीर, जिल्ह्याबाहेर मनमानीपणे प्रवासजिल्ह्यात आल्यावर तपासणी नाहीच, तपासणीसाठी गेलेल्या पथकांवर आसूड

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्याचे अतिशय अवघड असे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता १४९९पर्यंत पोहोचली आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यात स्थानिकांची संख्याच अधिक असल्याने जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दहशतीखाली नागरिक वावरत आहेत. त्यातच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही आता ४९ वर पोहोचली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणताना आरोग्य यंत्रणा बेजार होत आहे. डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी अथक लढा सुरू आहे.जिल्हा कोरोना संकटातून जात असताना खुद्द प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. काही अधिकारी रत्नागिरीतून अन्य जिल्ह्यांमध्ये जात आहेत व पुन्हा परतत आहेत. मात्र, कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा त्यांना हेतुपुरस्सर विसर पडलेला दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक अधिकारी असे परतले असून, स्वत: विलगीकरणात न राहता कार्यालयात येत आहेत.हे अधिकारी दौरे करून आल्यानंतर थेट कार्यालयात येत असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाबाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात येत आहे.

मात्र, या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी हे नियम नाहीत का, असे नागरिकांकडून विचारले जात आहे. काही अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही हिणकस वागणूक दिल्याची माहिती मिळत आहे.अधिकाऱ्यांची विनापास फिरती?सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, हे अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून विनापास किंवा विनापरवानगी प्रवास करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह त्यांचे वाहनचालक बाधित होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी