शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रत्नागिरी : अधिकारीच सरकार चालवत आहेत, माणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:06 IST

राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिक ठाकरे यांनी केला.

ठळक मुद्देअधिकारीच सरकार चालवत आहेतमाणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोपउद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतात

चिपळूण : राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे चिपळुणात आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीतच, उलट जनतेला आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे जनता सरकारला धडा शिकवण्याच्या इराद्याने संधीची वाट पाहात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी गोंधळलेले आहेत.

एकाही आश्वासनाची पूर्तता होत नाही. जूनमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, आजही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यादीमध्ये मोठा घोळ आहे. आज शेतकऱ्यांना हमीभावाची मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चुकीच्या धोरणामुळे जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.

शासनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले आहेत. जीएसटी, नोटाबंदी, महागाई अशा सर्वच विषयात सरकार फेल झाले आहे. त्यामुळे या सरकारकडे सांगण्यासारखा एकही चांगला विषय नाही. हजारो शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे. पाटबंधारे प्रकल्प ठप्प झाले आहेत. चुकीचे धोरण यास कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून हे सरकार सत्तेवर आले. मात्र, तीन वर्षात एकही भ्रष्टाचार सरकारने जनतेसमोर आणला नाही, असेही म्हणाले.उद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतातराज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गृहखात्याचे अपयश असून, कोरगाव - भीमाच्या घटनेमध्ये बाहेरच्यांचा हात आहे. त्या दृष्टीने चौकशी व्हायला हवी, असे सांगून सरकारमधील सेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्तेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने सोयीने शब्द बदलतात, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manikrao Thackreyमाणिकराव ठाकरेRatnagiriरत्नागिरी