शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

रत्नागिरी : अधिकारीच सरकार चालवत आहेत, माणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:06 IST

राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिक ठाकरे यांनी केला.

ठळक मुद्देअधिकारीच सरकार चालवत आहेतमाणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोपउद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतात

चिपळूण : राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे चिपळुणात आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीतच, उलट जनतेला आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे जनता सरकारला धडा शिकवण्याच्या इराद्याने संधीची वाट पाहात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी गोंधळलेले आहेत.

एकाही आश्वासनाची पूर्तता होत नाही. जूनमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, आजही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यादीमध्ये मोठा घोळ आहे. आज शेतकऱ्यांना हमीभावाची मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चुकीच्या धोरणामुळे जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.

शासनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले आहेत. जीएसटी, नोटाबंदी, महागाई अशा सर्वच विषयात सरकार फेल झाले आहे. त्यामुळे या सरकारकडे सांगण्यासारखा एकही चांगला विषय नाही. हजारो शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे. पाटबंधारे प्रकल्प ठप्प झाले आहेत. चुकीचे धोरण यास कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून हे सरकार सत्तेवर आले. मात्र, तीन वर्षात एकही भ्रष्टाचार सरकारने जनतेसमोर आणला नाही, असेही म्हणाले.उद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतातराज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गृहखात्याचे अपयश असून, कोरगाव - भीमाच्या घटनेमध्ये बाहेरच्यांचा हात आहे. त्या दृष्टीने चौकशी व्हायला हवी, असे सांगून सरकारमधील सेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्तेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने सोयीने शब्द बदलतात, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manikrao Thackreyमाणिकराव ठाकरेRatnagiriरत्नागिरी