शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

जिल्हा परिषदेत पूरहानी निधीवरून अधिकारी धारेवर

By admin | Updated: May 14, 2014 00:22 IST

रत्नागिरी : पूरहानीच्या १७ कोटी रुपयांच्या निधीवरुन आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना पदाधिकारी व सदस्यांनी कोंडीत पकडले

रत्नागिरी : पूरहानीच्या १७ कोटी रुपयांच्या निधीवरुन आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना पदाधिकारी व सदस्यांनी कोंडीत पकडले. पूरहानीचा कार्यक्रम सदोष असून, पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम राबवायचा असल्यास तो तपासून त्यामध्ये दुरुस्ती करुन कामे करण्यात यावीत, असा निर्णय साडेतीन तासांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. अध्यक्ष मनिषा जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या पूरहानीच्या निधीवरुन बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी पूरहानीच्या निधीतून सदस्यांनी सूचविलेली ५ लाख रुपयांची कामे समाविष्ट करण्यात आल्याचा ठराव मागील सभेच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आला होता. पूरहानीच्या कामांसाठी समिती गठीत केलेली असतानाही जिल्हा परिषद सदस्यांनी ५ लाखांची कामे कधी सूचविली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या सदस्या नेत्रा ठाकूर, अस्मिता केंद्रे व नेहा माने यांनीही २५ लाखांची मागणी ५ लाख रुपयांचे कामे कशी, अशी विचारणा करुन अधिकार्‍यांना धारेवर धरले. जिल्हा परिषद सदस्यांना केवळ २ कोटी ८५ लाख रुपये आणि उर्वरित १३ कोटी रुपयांचा निधी कुठे वाटप केला. आमदार, पालकमंत्र्यांना विश्वासात घेतलेत, मग अध्यक्षा व पदाधिकार्‍यांना का नाही, असे प्रश्न उपस्थित करुन त्यावर कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरीत उत्तर मागितले. कार्यकारी अभियंत्ते समर्पक उत्तरे देऊ न शकल्याने त्यांची कोंडी झाली होती. सदस्यांनी पाच लाख रुपयांची कामे सुचविलेली असतील तर कार्यक्रम चुकीचा आहे. तसेच पूरहानीच्या कामांचा निधी जिल्ह्याच्या बाहेर गेल्याचा आरोपही यावेळी सदस्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद संजय कदम यांनी पालकमंत्र्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे सदस्य जगदीश राजापकर, रचना महाडिक यांनी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात काय, अशी विचारणा केली. बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे ७ दिवसांमध्ये पूरहानीच्या कामाच्या मागणीबाबत निर्णय कसा काय मागितला. पूरहानीच्या कामांना आचारसंहिता नसतानाही ही कामे करण्यास जाणीवपूर्वक चालढकल करण्यात आली. तसेच अधिकार्‍यांना स्वायत्तता असूनही हा पूरहानीचा कार्यक्रम पूर्ण झालेला नाही. आता १५ मेपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो. तो न झाल्यास त्यास संबंधित समितीवर असलेले सर्वच जबाबदार असून, तशी नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम राबवायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (शहर वार्ताहर)