शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

जिल्हा परिषदेत पूरहानी निधीवरून अधिकारी धारेवर

By admin | Updated: May 14, 2014 00:22 IST

रत्नागिरी : पूरहानीच्या १७ कोटी रुपयांच्या निधीवरुन आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना पदाधिकारी व सदस्यांनी कोंडीत पकडले

रत्नागिरी : पूरहानीच्या १७ कोटी रुपयांच्या निधीवरुन आज (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना पदाधिकारी व सदस्यांनी कोंडीत पकडले. पूरहानीचा कार्यक्रम सदोष असून, पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम राबवायचा असल्यास तो तपासून त्यामध्ये दुरुस्ती करुन कामे करण्यात यावीत, असा निर्णय साडेतीन तासांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. अध्यक्ष मनिषा जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या पूरहानीच्या निधीवरुन बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी पूरहानीच्या निधीतून सदस्यांनी सूचविलेली ५ लाख रुपयांची कामे समाविष्ट करण्यात आल्याचा ठराव मागील सभेच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आला होता. पूरहानीच्या कामांसाठी समिती गठीत केलेली असतानाही जिल्हा परिषद सदस्यांनी ५ लाखांची कामे कधी सूचविली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या सदस्या नेत्रा ठाकूर, अस्मिता केंद्रे व नेहा माने यांनीही २५ लाखांची मागणी ५ लाख रुपयांचे कामे कशी, अशी विचारणा करुन अधिकार्‍यांना धारेवर धरले. जिल्हा परिषद सदस्यांना केवळ २ कोटी ८५ लाख रुपये आणि उर्वरित १३ कोटी रुपयांचा निधी कुठे वाटप केला. आमदार, पालकमंत्र्यांना विश्वासात घेतलेत, मग अध्यक्षा व पदाधिकार्‍यांना का नाही, असे प्रश्न उपस्थित करुन त्यावर कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरीत उत्तर मागितले. कार्यकारी अभियंत्ते समर्पक उत्तरे देऊ न शकल्याने त्यांची कोंडी झाली होती. सदस्यांनी पाच लाख रुपयांची कामे सुचविलेली असतील तर कार्यक्रम चुकीचा आहे. तसेच पूरहानीच्या कामांचा निधी जिल्ह्याच्या बाहेर गेल्याचा आरोपही यावेळी सदस्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद संजय कदम यांनी पालकमंत्र्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे सदस्य जगदीश राजापकर, रचना महाडिक यांनी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात काय, अशी विचारणा केली. बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे ७ दिवसांमध्ये पूरहानीच्या कामाच्या मागणीबाबत निर्णय कसा काय मागितला. पूरहानीच्या कामांना आचारसंहिता नसतानाही ही कामे करण्यास जाणीवपूर्वक चालढकल करण्यात आली. तसेच अधिकार्‍यांना स्वायत्तता असूनही हा पूरहानीचा कार्यक्रम पूर्ण झालेला नाही. आता १५ मेपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो. तो न झाल्यास त्यास संबंधित समितीवर असलेले सर्वच जबाबदार असून, तशी नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम राबवायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (शहर वार्ताहर)