शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

...आता दंडाची पावती जागेवरच !

By admin | Updated: August 17, 2016 23:10 IST

पोलिसांना आदेश : वाहनचालकाला न्यायालयात हजर करण्याची आवश्यकता नाही

दापोली : वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनाची कागदपत्र सोबत नसणे आणि वाहन सुस्थितीत नसताना रस्त्यावर आणणाऱ्या वाहनचालकांना राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून पूर्वी न्यायालयात हजर केले जात होते. मात्र, राज्यभरातील वाहतूक शाखेच्या पोलिसांना आता जाग्यावरच दंड आणि त्या दंडाची पावती फाडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हाभरात या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याने बेशिस्त वाहनचालक धास्तावले आहेत. नवीन आदेशानुसार वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास ३०० रुपये, गाडी चालवताना भ्रमणध्वनी कानाला लावलेला असल्यास १०० रुपये, धूमस्टाईल गाडी चालवताना आढळल्यास ५०० रुपये, त्याचप्रमाणे नवीन गाडी घेतल्यानंतर तिचे रजिस्ट्रेशन होण्यापूर्वीच नंबरविना चालवणे, यासाठी १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडीचा इंडिकेटर तुटलेला असणे आदींसाठी दंडाची आकारणी होणार आहे. दरम्यान, दापोली पोलीस स्थानकाच्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक शिंंदे यांनी १२ दिवसांत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गृह विभागाच्या नव्या आदेशामुळे आता वाहतूक पोलिसांना जाग्यावरच दंडाची वसुली करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यापूर्वी अशा वाहनचालकांना न्यायालयात हजर केले जात असे. त्यानंतर न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात येत असे. मात्र, या नव्या आदेशामुळे आता अशा बाबींसाठी न्यायालयात जाण्याची गरज संपुष्टात आली आहे. दरम्यान, एखाद्या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे आणि त्याने आपली गाडी दुसऱ्या व्यक्तीला मात्र जिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, अशा व्यक्तीला चालवण्यास दिल्यास आणि पोलिसांच्या तपासणीत ही बाब पुढे आल्यास गाडीच्या मालकाला ३०० रुपये आणि परवाना नसताना गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ३०० असा एकूण ६०० रुपयांचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे यापुढे आपल्या मालकीची गाडी परवाना नसलेल्या व्यक्तीला देताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)