शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लाॅकडाऊन कारवाईसाठी नव्हे तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, ती कारवाई करावी म्हणून नव्हे, तर कोरोनाची साथ आटोक्यात ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, ती कारवाई करावी म्हणून नव्हे, तर कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात केले.

जिल्हा प्रशासनाच्या लाॅकडाऊनच्या भूमिकेबाबत लोकांना माहिती व्हावी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने त्यांनी जनतेशी संवाद साधला. नागरिकांनीसुद्धा या फेसबुक लाइव्हला प्रतिसाद देत विविध प्रश्न या तिन्ही अधिकाऱ्यांना विचारले. लाॅकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी सुरू आहेत, कोणत्या बंद आहेत, लसीकरण, टेस्ट, जिल्हाबंदी, अनेक व्यावसायिकांनी आपले नुकसान होत असल्याने व्यवसाय सुरू ठेवावा का, असेही प्रश्न विचारले. तसेच काहींनी ७० वर्षांवरील ज्येष्ठांच्या घरी जाऊन लसीकरण करता येईल का, शेतीच्या कामांसाठी खासगी गाडी वापरता येईल का, असे असंख्य प्रश्न विचारून जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, डॉ. इंदूराणी जाखड यांच्याकडून त्याचे निरसन करून घेतले.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरीही जिल्हा महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शेवटच्या क्रमांकावर आहे. सक्रिय रुग्णांपैकी साठ टक्‍के रुग्णांना लक्षण नाहीत. त्यामुळे ही साथ अशीच आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. सद्य:परिस्थिती पाहता या लाॅकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले. या तिघांनीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत माहिती देतानाच प्रशासन कोरोना लढ्यासाठी सक्रियपणे सज्ज असल्याची ग्वाही दिली.

या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अडीच हजार लोकांनी कलेक्टर पेजला भेट दिली, तर ३५० लोकांनी कमेंटस दिल्या.