शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

लाॅकडाऊन कारवाईसाठी नव्हे तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, ती कारवाई करावी म्हणून नव्हे, तर कोरोनाची साथ आटोक्यात ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, ती कारवाई करावी म्हणून नव्हे, तर कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात केले.

जिल्हा प्रशासनाच्या लाॅकडाऊनच्या भूमिकेबाबत लोकांना माहिती व्हावी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने त्यांनी जनतेशी संवाद साधला. नागरिकांनीसुद्धा या फेसबुक लाइव्हला प्रतिसाद देत विविध प्रश्न या तिन्ही अधिकाऱ्यांना विचारले. लाॅकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टी सुरू आहेत, कोणत्या बंद आहेत, लसीकरण, टेस्ट, जिल्हाबंदी, अनेक व्यावसायिकांनी आपले नुकसान होत असल्याने व्यवसाय सुरू ठेवावा का, असेही प्रश्न विचारले. तसेच काहींनी ७० वर्षांवरील ज्येष्ठांच्या घरी जाऊन लसीकरण करता येईल का, शेतीच्या कामांसाठी खासगी गाडी वापरता येईल का, असे असंख्य प्रश्न विचारून जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, डॉ. इंदूराणी जाखड यांच्याकडून त्याचे निरसन करून घेतले.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरीही जिल्हा महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शेवटच्या क्रमांकावर आहे. सक्रिय रुग्णांपैकी साठ टक्‍के रुग्णांना लक्षण नाहीत. त्यामुळे ही साथ अशीच आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. सद्य:परिस्थिती पाहता या लाॅकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले. या तिघांनीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत माहिती देतानाच प्रशासन कोरोना लढ्यासाठी सक्रियपणे सज्ज असल्याची ग्वाही दिली.

या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अडीच हजार लोकांनी कलेक्टर पेजला भेट दिली, तर ३५० लोकांनी कमेंटस दिल्या.