शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या मोहासाठी नाही, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सत्तांतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:09 IST

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि ...

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि राज्यात सत्तांतर झाले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.कोकणाने आजवर शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. त्यामुळे कोकणातील लोकांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे हे हृदय असेल तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे फुफ्फुस आहे. कोकणाने शिवसेनेला नेहमीच ऑक्सिजन दिला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.राज्यात झालेल्या सत्तांतराचा निर्णय सत्तेसाठी घेतला नव्हता. रोज सावरकरांचा अपमान होत होता. बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली. ५० आमदार आणि १३ खासदारांनी त्यासाठी साथ दिली. अनेक नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, कार्यकर्ते आमच्यासोबत आले. अजूनही येत आहेत. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर हे सर्वजण आमच्यासोबत आले असते का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.बाळासाहेबांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांच्या विचारांना ज्यांनी टाळले, त्यांचे काय झाले हे तुम्ही पाहिलेच असेल. अशा विघ्नसंतोषी, हिंदुत्त्वाला विरोध करणार्यांचा या निवडणुकीत नायनाट करुन टाकूया, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे