शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

सत्तेच्या मोहासाठी नाही, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सत्तांतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:09 IST

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि ...

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि राज्यात सत्तांतर झाले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.कोकणाने आजवर शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. त्यामुळे कोकणातील लोकांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे हे हृदय असेल तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे फुफ्फुस आहे. कोकणाने शिवसेनेला नेहमीच ऑक्सिजन दिला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.राज्यात झालेल्या सत्तांतराचा निर्णय सत्तेसाठी घेतला नव्हता. रोज सावरकरांचा अपमान होत होता. बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली. ५० आमदार आणि १३ खासदारांनी त्यासाठी साथ दिली. अनेक नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, कार्यकर्ते आमच्यासोबत आले. अजूनही येत आहेत. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर हे सर्वजण आमच्यासोबत आले असते का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.बाळासाहेबांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांच्या विचारांना ज्यांनी टाळले, त्यांचे काय झाले हे तुम्ही पाहिलेच असेल. अशा विघ्नसंतोषी, हिंदुत्त्वाला विरोध करणार्यांचा या निवडणुकीत नायनाट करुन टाकूया, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे