शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सत्तेच्या मोहासाठी नाही, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सत्तांतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:09 IST

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि ...

राजापूर : आम्हाला सत्तेचा मोह नाही. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. म्हणूनच आम्ही ठाम भूमिका घेतली आणि राज्यात सत्तांतर झाले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.कोकणाने आजवर शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर खूप प्रेम केले. त्यामुळे कोकणातील लोकांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे हे हृदय असेल तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे शिवसेनेचे फुफ्फुस आहे. कोकणाने शिवसेनेला नेहमीच ऑक्सिजन दिला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.राज्यात झालेल्या सत्तांतराचा निर्णय सत्तेसाठी घेतला नव्हता. रोज सावरकरांचा अपमान होत होता. बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली. ५० आमदार आणि १३ खासदारांनी त्यासाठी साथ दिली. अनेक नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, कार्यकर्ते आमच्यासोबत आले. अजूनही येत आहेत. जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर हे सर्वजण आमच्यासोबत आले असते का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.बाळासाहेबांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांच्या विचारांना ज्यांनी टाळले, त्यांचे काय झाले हे तुम्ही पाहिलेच असेल. अशा विघ्नसंतोषी, हिंदुत्त्वाला विरोध करणार्यांचा या निवडणुकीत नायनाट करुन टाकूया, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे