शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

वर्षात जमलं नाही, ते आठवड्यात झालं

By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST

जिल्हा परिषद : निलंबनाच्या कारवाईनं सगळं जमवलं !

रत्नागिरी : कारवाईचा बडगा उगारला की, कर्मचाऱ्यांचा कामाचा ‘उत्साह’ किती वाढू शकतो, हे ग्रामसेवकांच्या ‘शक्ती’ने दाखवून दिले आहे. जन्म-मृत्यू नोंदीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करताच उर्वरित ग्रामसेवकांनी ताकद पणाला लावली आणि दोन वर्षे रखडलेले काम केवळ आठवडाभरात पूर्णत्त्वाकडे नेताना चक्क ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदीचे संगणकीकरण केले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारताच आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यू नोंदीचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक कारवाईच्या धसक्याने ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू संगणकीकरणाच्या कामात व्यस्त आहेत. जे काम गेल्या दोन वर्षांत झाले नाही, ते केवळ एका आठवड्यात कसे झाले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या संगणकीकरणामुळेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे ई-टेंडरिंगने करण्यात येत आहेत. मात्र, अनेक ग्रामपंचायती त्यामध्येही चालढकल करीत असल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.सर्व ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आल्यानंतर जन्म-मृत्यूची नोंद संगणकीकृत करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून जन्म-मृत्यूच्या केवळ दीड लाख नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींबाबतचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी घेतला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत नापसंती व्यक्त करुन कारवाईची धडक मोहीमच उघडली. त्यांनी याप्रकरणी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे ग्रामसेवकांसह जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली होती. कारवाईच्या धडकेने ग्रामसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जन्म-मृत्यूच्या नोंदी आतापर्यंत केवळ दीड लाखापर्यंत संगणकीकृत करण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाईनंतर या नोंदी संगणकीकरण करण्याच्या कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आल्या. आतापर्यंत जन्माच्या ४ लाख २८ हजार आणि मृत्यूच्या २ लाख ५४ हजार नोंदी करण्यात आल्या. (शहर वार्ताहर)