शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वर्षात जमलं नाही, ते आठवड्यात झालं

By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST

जिल्हा परिषद : निलंबनाच्या कारवाईनं सगळं जमवलं !

रत्नागिरी : कारवाईचा बडगा उगारला की, कर्मचाऱ्यांचा कामाचा ‘उत्साह’ किती वाढू शकतो, हे ग्रामसेवकांच्या ‘शक्ती’ने दाखवून दिले आहे. जन्म-मृत्यू नोंदीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करताच उर्वरित ग्रामसेवकांनी ताकद पणाला लावली आणि दोन वर्षे रखडलेले काम केवळ आठवडाभरात पूर्णत्त्वाकडे नेताना चक्क ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदीचे संगणकीकरण केले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारताच आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यू नोंदीचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक कारवाईच्या धसक्याने ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू संगणकीकरणाच्या कामात व्यस्त आहेत. जे काम गेल्या दोन वर्षांत झाले नाही, ते केवळ एका आठवड्यात कसे झाले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या संगणकीकरणामुळेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे ई-टेंडरिंगने करण्यात येत आहेत. मात्र, अनेक ग्रामपंचायती त्यामध्येही चालढकल करीत असल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.सर्व ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आल्यानंतर जन्म-मृत्यूची नोंद संगणकीकृत करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून जन्म-मृत्यूच्या केवळ दीड लाख नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींबाबतचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी घेतला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत नापसंती व्यक्त करुन कारवाईची धडक मोहीमच उघडली. त्यांनी याप्रकरणी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे ग्रामसेवकांसह जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली होती. कारवाईच्या धडकेने ग्रामसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जन्म-मृत्यूच्या नोंदी आतापर्यंत केवळ दीड लाखापर्यंत संगणकीकृत करण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाईनंतर या नोंदी संगणकीकरण करण्याच्या कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आल्या. आतापर्यंत जन्माच्या ४ लाख २८ हजार आणि मृत्यूच्या २ लाख ५४ हजार नोंदी करण्यात आल्या. (शहर वार्ताहर)