शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

ना शाळा, ना परीक्षा, तरीही पावणेदोन लाख विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. सुरुवातीला पहिली ते नववी व अकरावी त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्वांना पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख ८८ हजार ५२१ विद्यार्थी पास झाले आहेत.

प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने यावर्षीही ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावात नेटवर्कची समस्या आहे, त्याठिकाणी पालक, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. ऑनलाइनमध्ये वेळेची मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना किती आकलन झाले आहे, हे समजणे अवघड आहे. गतवर्षी सहामाहीपर्यंत पाचवी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या. पहिली ते चाैथीपर्यंत मात्र एप्रिलपर्यंत ऑनलाइन अध्यापन सुरू होते. वार्षिक परीक्षा रद्द झाली. मात्र, सहामाही व दोन चाचणी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी तर गुणांचा पाऊसच पाडला. शिवाय सरसकट पासचा मात्र सर्व विद्यार्थांना फायदा झाला. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून मूल्यांकन सुरू आहे.

नेटवर्कची समस्या फारशी उद्भवत नाही. त्यामुळे तास चुकण्याचा प्रश्न नाही.

n मोजक्या तासात बेसिक गोष्टी समजविल्या जातात. त्यामुळे खासगी जादा तासात या गोष्टी शहरातील मुले समजावून घेतात.

n तांत्रिक गोष्टी हाताळता येत असल्याने ऑनलाइन अध्यापन सोपे झाले आहे.

n नेटवर्क समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

n गोरगरीब पालकांकडे ॲण्ड्राॅइड मोबाइल उपलब्ध नसल्यामुळे मुलांच्या अध्यापनाचा प्रश्न निर्माण होतो.

n आठवड्यातून तीन ते चार दिवस शिक्षक प्रत्यक्ष वर्ग घेत असल्यामुळे मुलांना त्याचा फायदा अभ्यासासाठी होत आहे.

फायदे

n ऑनलाइनमुळे शाळेच्या अध्यापनाचे तास कमी झाले आहेत.

n प्रत्यक्ष विद्यार्थी समोर नसल्याने शिक्षकांचे लक्ष चुकविले जाते.

n सरसकट पासच्या निर्णयामुळे अभ्यासात कमजोर असणाऱ्या मुलांनाही फायदा झाला आहे.

n दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही सरसकट पासचा लाभ झाला आहे.

तोटे

n वेळेची मर्यादा असल्याने शिक्षकांना अध्यापनासाठी कसब लावावे लागते.

n विद्यार्थी समोर नसल्याने प्रत्यक्ष मुलांना किती आकलन झाले समजत नाही. मुलेही सांगत नाहीत.

n सरसकट पासच्या निर्णयाचा सर्वांना फायदा झाला असला तरी भविष्यातील करिअरसाठी मात्र तोटाच आहे.