शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा, तरीही पावणेदोन लाख विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. सुरुवातीला पहिली ते नववी व अकरावी त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्वांना पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख ८८ हजार ५२१ विद्यार्थी पास झाले आहेत.

प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने यावर्षीही ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावात नेटवर्कची समस्या आहे, त्याठिकाणी पालक, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. ऑनलाइनमध्ये वेळेची मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना किती आकलन झाले आहे, हे समजणे अवघड आहे. गतवर्षी सहामाहीपर्यंत पाचवी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या. पहिली ते चाैथीपर्यंत मात्र एप्रिलपर्यंत ऑनलाइन अध्यापन सुरू होते. वार्षिक परीक्षा रद्द झाली. मात्र, सहामाही व दोन चाचणी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी तर गुणांचा पाऊसच पाडला. शिवाय सरसकट पासचा मात्र सर्व विद्यार्थांना फायदा झाला. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून मूल्यांकन सुरू आहे.

नेटवर्कची समस्या फारशी उद्भवत नाही. त्यामुळे तास चुकण्याचा प्रश्न नाही.

n मोजक्या तासात बेसिक गोष्टी समजविल्या जातात. त्यामुळे खासगी जादा तासात या गोष्टी शहरातील मुले समजावून घेतात.

n तांत्रिक गोष्टी हाताळता येत असल्याने ऑनलाइन अध्यापन सोपे झाले आहे.

n नेटवर्क समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

n गोरगरीब पालकांकडे ॲण्ड्राॅइड मोबाइल उपलब्ध नसल्यामुळे मुलांच्या अध्यापनाचा प्रश्न निर्माण होतो.

n आठवड्यातून तीन ते चार दिवस शिक्षक प्रत्यक्ष वर्ग घेत असल्यामुळे मुलांना त्याचा फायदा अभ्यासासाठी होत आहे.

फायदे

n ऑनलाइनमुळे शाळेच्या अध्यापनाचे तास कमी झाले आहेत.

n प्रत्यक्ष विद्यार्थी समोर नसल्याने शिक्षकांचे लक्ष चुकविले जाते.

n सरसकट पासच्या निर्णयामुळे अभ्यासात कमजोर असणाऱ्या मुलांनाही फायदा झाला आहे.

n दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही सरसकट पासचा लाभ झाला आहे.

तोटे

n वेळेची मर्यादा असल्याने शिक्षकांना अध्यापनासाठी कसब लावावे लागते.

n विद्यार्थी समोर नसल्याने प्रत्यक्ष मुलांना किती आकलन झाले समजत नाही. मुलेही सांगत नाहीत.

n सरसकट पासच्या निर्णयाचा सर्वांना फायदा झाला असला तरी भविष्यातील करिअरसाठी मात्र तोटाच आहे.