शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:47 IST

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते.

ठळक मुद्दे- कापसाळ ग्रामपंचायत- आरक्षण न मिळाल्यास बहिष्कार टाकणार

चिपळूण :  सध्या अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणावरून सर्वत्र ओरड होत असतानाच कापसाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बौद्धवाडीने हरकत दाखल केली आहे. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ६२ वर्षांत अनुसूचित जाती-जमातीला येथे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते. या बहुजन समाजाची उन्नती व्हावी, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क, अधिकार मिळवून दिले. मात्र, आज २१ व्या शतकातदेखील बहुजन समाजातील प्रामुख्याने अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाला त्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहावे लागत आहे.सन १९५८मध्ये कापसाळ ग्रामपंचायतीच्या स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत सरपंच, उपसरपंच या प्रमुख पदांसह ग्रामपंचायत सदस्य पददेखील अनुसूचित जाती-जमातीतील बौद्ध समाजाला मिळालेले नाही. कापसाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या समाजाची लोकसंख्या जवळपास २०० ते २५०च्या दरम्यान असूनही अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडत नसेल तर ते दुर्दैव आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण न मिळाल्यास बौद्ध समाज या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी बौद्धजन हितसंरक्षण समितीचे रमण मोहिते, सुभाष मोहिते, सचिव रुपेश हळदे, राहुल कांबळे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेवती मोहिते व अन्य सदस्या उपस्थित होत्या.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत