शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:47 IST

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते.

ठळक मुद्दे- कापसाळ ग्रामपंचायत- आरक्षण न मिळाल्यास बहिष्कार टाकणार

चिपळूण :  सध्या अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणावरून सर्वत्र ओरड होत असतानाच कापसाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बौद्धवाडीने हरकत दाखल केली आहे. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ६२ वर्षांत अनुसूचित जाती-जमातीला येथे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते. या बहुजन समाजाची उन्नती व्हावी, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क, अधिकार मिळवून दिले. मात्र, आज २१ व्या शतकातदेखील बहुजन समाजातील प्रामुख्याने अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाला त्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहावे लागत आहे.सन १९५८मध्ये कापसाळ ग्रामपंचायतीच्या स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत सरपंच, उपसरपंच या प्रमुख पदांसह ग्रामपंचायत सदस्य पददेखील अनुसूचित जाती-जमातीतील बौद्ध समाजाला मिळालेले नाही. कापसाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या समाजाची लोकसंख्या जवळपास २०० ते २५०च्या दरम्यान असूनही अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडत नसेल तर ते दुर्दैव आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण न मिळाल्यास बौद्ध समाज या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी बौद्धजन हितसंरक्षण समितीचे रमण मोहिते, सुभाष मोहिते, सचिव रुपेश हळदे, राहुल कांबळे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेवती मोहिते व अन्य सदस्या उपस्थित होत्या.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत