शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

कोणीही आमचा नाद करायचा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

खेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार हेच आपले संस्कार आहेत. आमच्या पक्षप्रमुखांची बदनामी शिवसैनिक ...

खेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार हेच आपले संस्कार आहेत. आमच्या पक्षप्रमुखांची बदनामी शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत. कोणी अंगावर येणार असेल तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. याची प्रचिती नारायण राणे व भाजपवाल्यांना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी करून दिली आहे. यापुढे अशी चूक ते पुन्हा कुणीही करणार नाहीत. आमचा नाद करायचा नाही, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.

धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विकासकामांसाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. भूमिपुत्रांवरील अन्याय भास्कर जाधव खपवून घेणार नाही. माझे बांधव प्रदूषणाचा सामना करतात. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या रोजगारांवर त्यांचा प्रथम हक्क आहे. कुणी कायद्याची पोलिसांची भीती दाखवून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार असेल तर गाठ शिवसेनेशी आहे. गनिमी काव्याने त्यांना जशासतशे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसैनिकांनी संघटनात्मक कामावर भर द्यावा. गावागावांत शिवसेना मजूबत उभी करा. धामणदेवी गटावरचा शिवसेनेचा भगवा सतत तेजाने फडकवत ठेवा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी आक्रमक भाषण करून शिवसैनिकांमध्ये जोश भरला. माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती मानसी जगदाळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी आवाशी गावचे सरपंच ॲड. राज आंब्रे, पंचायत समिती सदस्य एस. के. आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे, अरुण चव्हाण, सरपंच चंद्रकांत चाळके, सरपंच अंकुश काते यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. शिवसेना धामणदेवीतर्फे दिनेश शिरीषकर, विजय साळुंखे, संदीप आंब्रे, एस. के. आंब्रे यांनी आमदारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ग्रामपंचायत आवाशी, शिवसेना शाखा आवाशी, युवासेना धामणदेवी विभाग तसेच महिला आघाडीतर्फे आमदार जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती मानसी जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपतालुकाप्रमुख विष्णू आंब्रे, माजी उपसभापती पप्पू आंब्रे, दत्ता गोठल, सुरेश काटकर, जीवन आंब्रे, पिंट्या आंब्रे, हुसेन घाटे, सुरेश काटकर, सुरेश जाधव, वहाब सैन, रहिमान चौगुले, मनोहर कालेकर, सतीश आंब्रे, राजन पाष्टे, विभागातील सरपंच, शाखाप्रमुख, युवासैनिक, महिला आघाडी, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपविभागप्रमुख दिनेश शिरीषकर, विजय साळुंखे, एस. के. आंब्रे यांनी बैठकीचे उत्तम नियोजन केले होते. दिनेश शिरीषकर, भागणे यांनी सूत्रसंचालन केले.