शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कुणीही दौरा केला तरी आमदार, खासदार महायुतीचेच : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: February 4, 2024 19:14 IST

रविवारी रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रत्नागिरीत होत असलेल्या नवनव्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. 

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही कोठेही दौरा करण्याचा अधिकार आहे. अर्थात आता ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीत येत असले तरी येथील आमदार, खासदार यहसायुतीचेच असतील, असा ठाम दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

रविवारी रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रत्नागिरीत होत असलेल्या नवनव्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. सोमवारी उद्वव ठाकरे रत्नागिरीमध्ये येणार आहेत. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणीही कोठेही दौरा करू शकतो. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळतो, त्याचे मतामध्ये कितीसे रुपांतर होते, यावर त्या राजकीय पक्षाचे अस्तित्त्व अवलंबून असते. त्यांनी दौरा केला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी - रायगडमध्ये महायुतीचाच खासदार असेल. या सर्व ठिकाणी महायुतीचेच आमदार निवडून येतील, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे आणि हे सरकार तो शब्द पाळेल, असे त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयावर बोलताना सांगितले. आमदार गणपत गायकवाड यांनी केलेले फायरींग अयोग्यच आहे. कोणीही त्याचे समर्थन करणार नाही. लोकप्रतिनिधीही अशा पद्धतीने वागू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा, कोकणातील सर्वात उंच अशी श्री विठ्ठलाची मूर्ती यांचे लोकार्पण तसेच इतर कामांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत