शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारचं पुढचं पाऊल ७३ गावांचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:52 IST

मेहरुन नाकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील कामे सुरू असून, तिसरा टप्पा राबवण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तिसºया टप्प्यासाठी जिल्ह्यातून ७३ गावांची निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे काम २०१५ - १६मध्ये झाले. जिल्ह्यातील ४५ ...

मेहरुन नाकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील कामे सुरू असून, तिसरा टप्पा राबवण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तिसºया टप्प्यासाठी जिल्ह्यातून ७३ गावांची निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे काम २०१५ - १६मध्ये झाले. जिल्ह्यातील ४५ गावांतून ही योजना राबवण्यात येत असताना १६२७ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी आतापर्यंत १६१० कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी ३१ कोटी २८ लाख ५८ हजार रूपये खर्च झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असतानाच दुसºया टप्प्याचे काम २०१६-१७ साली सुरू झाले. दुसºया टप्प्यांतर्गत २७ गावांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी २१ कोटी ८८ लाख १२ हजार रूपयांचा निधीही मंजूर झाला होता. प्रत्यक्षात ७५३ कामांचे उद्दिष्ट असताना ६९६ कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, आतापर्यंत यातील ४३७ कामे पूर्ण झाली असून, ८६ कामे सुरू असून, अद्याप २३६ कामे होेणे बाकी आहेत. आतापर्यंतच्या कामासाठी एकूण ३ कोटी १६ लाख ६१ हजार रूपये इतका निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवारच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असता, राज्यभरातील दुसºया टप्प्यातील सर्व कामे जूनअखेर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत निम्म्याहून अधिक कामे पूर्ण झाली असली, तरी ३१६ कामे प्रलंबित आहेत. शिवाय पहिल्या टप्प्यातील १७ कामे रखडली आहेत.तिसरा टप्पा २०१७-१८मध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या दोन टप्प्यासाठी गावाची निवड करताना जे निकष लावण्यात आले, त्याच निकषाच्या आधारे तिसºया टप्प्यासाठी गावांची निवड केली जाणार आहे.जिल्हाभरात फळबाग लागवड, वृक्षलागवड करण्याबरोबरच सलग समतल चर, अनगड दगडीबांध, सिमेंट नालाबांध, वळण नालाबांध, शेततळी बांधण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून एकूण ७३ गावांची निवड केली जाणार आहे. चार तालुक्यातील गावांची नावे सुचविण्यात आली आहेत. मात्र, पाच तालुक्यांनी अद्याप नावांची यादी पाठवलेली नाही.दापोली तालुक्यातून बुरोंडी, हर्णै, इळणे, किन्नळ, पालगड, सातेरेतर्फ नातू, टाळसुरे, पावनळ, केळशी, चंद्रनगर, गावतळे, कुडावळे, रत्नागिरी तालुक्यातून मिरवणे, देऊड, उक्षी, मंडणगड तालुक्यातून सोवळी, आंबवणे बुद्रुक, कुडूक खुर्द, नारगोली, वेळास, तळेघर, जावळे, राजापूर तालुक्यातून केळवली, होळी, कोंड्ये तर्फ सांैदळ, हसोळ तर्फ सौंदळ, कुंभवडे, तुळसवडे, मंदरूळ, गोठणेदोनिवडे, जैतापूर या गावांची निवड करून यादी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.