शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

जलयुक्त शिवारचं पुढचं पाऊल ७३ गावांचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:52 IST

मेहरुन नाकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील कामे सुरू असून, तिसरा टप्पा राबवण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तिसºया टप्प्यासाठी जिल्ह्यातून ७३ गावांची निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे काम २०१५ - १६मध्ये झाले. जिल्ह्यातील ४५ ...

मेहरुन नाकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील कामे सुरू असून, तिसरा टप्पा राबवण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तिसºया टप्प्यासाठी जिल्ह्यातून ७३ गावांची निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे काम २०१५ - १६मध्ये झाले. जिल्ह्यातील ४५ गावांतून ही योजना राबवण्यात येत असताना १६२७ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी आतापर्यंत १६१० कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी ३१ कोटी २८ लाख ५८ हजार रूपये खर्च झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असतानाच दुसºया टप्प्याचे काम २०१६-१७ साली सुरू झाले. दुसºया टप्प्यांतर्गत २७ गावांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी २१ कोटी ८८ लाख १२ हजार रूपयांचा निधीही मंजूर झाला होता. प्रत्यक्षात ७५३ कामांचे उद्दिष्ट असताना ६९६ कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, आतापर्यंत यातील ४३७ कामे पूर्ण झाली असून, ८६ कामे सुरू असून, अद्याप २३६ कामे होेणे बाकी आहेत. आतापर्यंतच्या कामासाठी एकूण ३ कोटी १६ लाख ६१ हजार रूपये इतका निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवारच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असता, राज्यभरातील दुसºया टप्प्यातील सर्व कामे जूनअखेर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत निम्म्याहून अधिक कामे पूर्ण झाली असली, तरी ३१६ कामे प्रलंबित आहेत. शिवाय पहिल्या टप्प्यातील १७ कामे रखडली आहेत.तिसरा टप्पा २०१७-१८मध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या दोन टप्प्यासाठी गावाची निवड करताना जे निकष लावण्यात आले, त्याच निकषाच्या आधारे तिसºया टप्प्यासाठी गावांची निवड केली जाणार आहे.जिल्हाभरात फळबाग लागवड, वृक्षलागवड करण्याबरोबरच सलग समतल चर, अनगड दगडीबांध, सिमेंट नालाबांध, वळण नालाबांध, शेततळी बांधण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून एकूण ७३ गावांची निवड केली जाणार आहे. चार तालुक्यातील गावांची नावे सुचविण्यात आली आहेत. मात्र, पाच तालुक्यांनी अद्याप नावांची यादी पाठवलेली नाही.दापोली तालुक्यातून बुरोंडी, हर्णै, इळणे, किन्नळ, पालगड, सातेरेतर्फ नातू, टाळसुरे, पावनळ, केळशी, चंद्रनगर, गावतळे, कुडावळे, रत्नागिरी तालुक्यातून मिरवणे, देऊड, उक्षी, मंडणगड तालुक्यातून सोवळी, आंबवणे बुद्रुक, कुडूक खुर्द, नारगोली, वेळास, तळेघर, जावळे, राजापूर तालुक्यातून केळवली, होळी, कोंड्ये तर्फ सांैदळ, हसोळ तर्फ सौंदळ, कुंभवडे, तुळसवडे, मंदरूळ, गोठणेदोनिवडे, जैतापूर या गावांची निवड करून यादी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.