शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी नवीन निविदा, जूनी निविदा रद्द

By मेहरून नाकाडे | Updated: October 17, 2023 19:36 IST

एमआयडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री उदय सामंतांचे आश्वासन

मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गेली दहा वर्ष रखडले आहे. बसस्थानक बांधकामाच्या जुन्या ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आली असून, १४ ते १५ कोटींच्या नवीन कामाची निविदा प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना हायटेक बसस्थानकाची प्रतिक्षा आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरात सरकार बदलले, महागाईमुळे मंजूर निधीमध्ये वाढीवर निधीची मागणी यासह कोरोना संकटामुळे बसस्थानकाचे काम रखडले. ज्या ठेकेदारांनी हे काम घेतले होते, त्यांनी कामात दिरंगाई केली तसेच निधी वाढवून मागितल्याने ठेकाच रद्द करण्यात आला. मात्र पुन्हा याची फेरनिविदा काढण्यात येणार असून, या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या कामाला पाच ते सहा महिने लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधून निधी देण्यास मंजुरी दिली असून, या हायटेक बसस्थानकाचा प्रश्न आता लवकरच   मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :state transportएसटी