शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शिक्षण क्षेत्रात ई-लर्निंगचे नवीन पर्व

By admin | Updated: July 21, 2014 23:39 IST

ई - लर्निंगचे सादरीकरण : रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला

रत्नागिरी : जिल्ह्यातील १३७ माध्यमिक शाळांमध्ये ई - लर्निंग सुविधा सुरू होणार आहे. ही सुविधा राबविणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा असून, राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग ठरणाऱ्या ई - लर्निंग प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात नवीन पर्व सुरू होणार आहे, असे उद्गार समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ई - लर्निंग प्रकल्प सादरीकरणाच्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण १७३ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी पाचवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये ई - लर्निंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. दहा शाळांमध्ये गतवर्षी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात काही उर्दू शाळांंचाही समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्र्ण उपक्रमांतर्गत यासाठी १ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा जाधव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, अध्ययन क्षमता वाढविणे, शाळांमधील शून्य पटसंख्या कमी करणे आदी मुख्य उद्देश असल्याचे शिक्षणाधिकारी अहिरे यांनी प्रस्तावनेत सांगितले. यावेळी ई- लर्निंग सुविधा देणाऱ्या ओम इन्फोटेक कंपनीचे नीलेश साळुंखे आणि रोहित नागपुरे यांनी अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या या सुविधेत अनिमेटेड, प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरील (एमपीएस्सी) सुमारे १५००० प्रश्नांचा समावेश आहेहा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाळांनीदेखील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले. सोमवार, २८ रोजी सकाळी १०.३० वाजता सावरकर नाट्यगृहात या सुविधेचे उदघाटन होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात येणार आहे. राज्याच्या युवा धोरणाच्या अंमलबजावणीचाही प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. (प्रतिनिधी)