शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शिक्षण क्षेत्रात ई-लर्निंगचे नवीन पर्व

By admin | Updated: July 21, 2014 23:39 IST

ई - लर्निंगचे सादरीकरण : रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला

रत्नागिरी : जिल्ह्यातील १३७ माध्यमिक शाळांमध्ये ई - लर्निंग सुविधा सुरू होणार आहे. ही सुविधा राबविणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा असून, राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग ठरणाऱ्या ई - लर्निंग प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात नवीन पर्व सुरू होणार आहे, असे उद्गार समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ई - लर्निंग प्रकल्प सादरीकरणाच्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण १७३ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी पाचवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये ई - लर्निंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. दहा शाळांमध्ये गतवर्षी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात काही उर्दू शाळांंचाही समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्र्ण उपक्रमांतर्गत यासाठी १ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा जाधव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, अध्ययन क्षमता वाढविणे, शाळांमधील शून्य पटसंख्या कमी करणे आदी मुख्य उद्देश असल्याचे शिक्षणाधिकारी अहिरे यांनी प्रस्तावनेत सांगितले. यावेळी ई- लर्निंग सुविधा देणाऱ्या ओम इन्फोटेक कंपनीचे नीलेश साळुंखे आणि रोहित नागपुरे यांनी अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या या सुविधेत अनिमेटेड, प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरील (एमपीएस्सी) सुमारे १५००० प्रश्नांचा समावेश आहेहा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाळांनीदेखील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले. सोमवार, २८ रोजी सकाळी १०.३० वाजता सावरकर नाट्यगृहात या सुविधेचे उदघाटन होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात येणार आहे. राज्याच्या युवा धोरणाच्या अंमलबजावणीचाही प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. (प्रतिनिधी)