शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन ४८ फेऱ्या सुरू

By admin | Updated: July 2, 2014 00:07 IST

रत्नागिरी विभाग : मागेल त्याला एस. टी. सेवा...

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एस. टी.च्या ४८ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय ‘मागेल त्याला बस’ याप्रमाणे ज्या शाळांकडून किंवा प्रवाशांकडून शाळेसाठी बसफेरीची मागणी करण्यात येईल, त्याठिकाणी तत्काळ बसफेरी सुरू करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली.शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घरापासून जास्त अंतर असेल, त्यांच्यासाठी शालेय फेरी सुरू करण्यात येते. शाळांकडून तसेच प्रवाशांकडून शाळेच्या वेळेत स्वतंत्र गाडीची मागणी करण्यात येते. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मागण्यांची दखल घेऊन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील काही शाळांसाठी येणारे विद्यार्थी अन्य प्रभागातून येतात. त्यांना बसस्थानकापासून शाळेचे अंतर लांब पडते. परिणामी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. शिवाय संबंधित विद्यार्थ्यांना रिक्षा वाहतूक तसेच मोटार वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे पास सवलत असलेली एस. टी. वाहतूक सोयीची ठरते. जिल्ह्यात पासधारक ५२ हजार विद्यार्थी असून, त्यांना स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्यात येतो. खासगी वाहतुकीपेक्षा एस. टी. पास दर कमी असल्याने विद्यार्थ्यांचा किंबहुना पालकांचा ओढा एस. टी.कडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)