शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

एकजुटीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये आहे. शासनाने गृहविलगीकरण बंद केले आहे. कोरोना ...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये आहे. शासनाने गृहविलगीकरण बंद केले आहे. कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा अखंड राबत आहे. जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. व्यवसाय ठप्प असल्याने व्यावसायिकांची ओरड सुरू आहे. गोरगरिबांना काम नसल्यामुळे उपासमार सोसावी लागत आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. एकूणच विचित्र परिस्थिती निर्माण झाली असताना राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. जनतेला करमणुकीची नाही तर सहानुभूतीची तसेच भावनिक आधाराची गरज आहे. वादविवाद बाजूला ठेवून जर एकमेकांच्या हातात हात घालून कोरोना घालविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयावर असलेला ताण व खासगी रुग्णालयांतून होणारी लूट यामुळे सर्वसामान्यांची फरफट होत आहे. अनेक कुटुंबे कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत.

राज्यातील सत्ता व केंद्रातील सत्ता वेगवेगळ्या पक्षाची असली तरी स्थानिक नेतेमंडळींनी आपापल्या परीने जिल्हावासीयांसाठी निधी मिळवून देत विकास साधण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे विकासाच्या गोष्टी बाजूलाच राहिल्या आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करताना, विविध यंत्रणांची पुरती दमछाक झाली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगण्यात येत असून, मुलांना याचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात असल्याने सर्वसामान्य जनता भीतीच्या छायेखाली आहे. निव्वळ आश्वासने देण्यापेक्षा जर प्रत्येकाने ठोस कारवाई केली तर नक्कीच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार हाेण्यास वेळ लागणार नाही. अजूनही वेळ गेली नाही. जिल्हावासियांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या गोष्टी बाजूला ठेवून केवळ ‘माणुसकीचा धर्म’ जोपासून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरावर लस उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र लसीकरणावेळीही ज्येष्ठ नागरिक त्यातही व्याधिग्रस्तांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. म्युकरमायकोसिसनेही जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत राजकीय नेतेमंडळी असो वा पदाधिकाऱ्यांना प्रभावीपणे मदत करण्याची आवश्यकता आहे. जनतेमध्येही विश्वास निर्माण होईल, अशी कार्यपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.