शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

एकजुटीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये आहे. शासनाने गृहविलगीकरण बंद केले आहे. कोरोना ...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये आहे. शासनाने गृहविलगीकरण बंद केले आहे. कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा अखंड राबत आहे. जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. व्यवसाय ठप्प असल्याने व्यावसायिकांची ओरड सुरू आहे. गोरगरिबांना काम नसल्यामुळे उपासमार सोसावी लागत आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. एकूणच विचित्र परिस्थिती निर्माण झाली असताना राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. जनतेला करमणुकीची नाही तर सहानुभूतीची तसेच भावनिक आधाराची गरज आहे. वादविवाद बाजूला ठेवून जर एकमेकांच्या हातात हात घालून कोरोना घालविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयावर असलेला ताण व खासगी रुग्णालयांतून होणारी लूट यामुळे सर्वसामान्यांची फरफट होत आहे. अनेक कुटुंबे कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत.

राज्यातील सत्ता व केंद्रातील सत्ता वेगवेगळ्या पक्षाची असली तरी स्थानिक नेतेमंडळींनी आपापल्या परीने जिल्हावासीयांसाठी निधी मिळवून देत विकास साधण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे विकासाच्या गोष्टी बाजूलाच राहिल्या आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करताना, विविध यंत्रणांची पुरती दमछाक झाली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगण्यात येत असून, मुलांना याचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात असल्याने सर्वसामान्य जनता भीतीच्या छायेखाली आहे. निव्वळ आश्वासने देण्यापेक्षा जर प्रत्येकाने ठोस कारवाई केली तर नक्कीच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार हाेण्यास वेळ लागणार नाही. अजूनही वेळ गेली नाही. जिल्हावासियांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या गोष्टी बाजूला ठेवून केवळ ‘माणुसकीचा धर्म’ जोपासून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरावर लस उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र लसीकरणावेळीही ज्येष्ठ नागरिक त्यातही व्याधिग्रस्तांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. म्युकरमायकोसिसनेही जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत राजकीय नेतेमंडळी असो वा पदाधिकाऱ्यांना प्रभावीपणे मदत करण्याची आवश्यकता आहे. जनतेमध्येही विश्वास निर्माण होईल, अशी कार्यपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.