शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कदमांमुळे राष्ट्रवादी अडचणींच्या फेऱ्यात

By admin | Updated: June 30, 2014 00:18 IST

विधानसभा निवडणूक : चार जागा खेचण्याचे आव्हान

चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे पक्षत्याग करुन अजूनही बाहेर असल्याने जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या चार जागा आपल्याकडे खेचण्याचे आव्हान नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात उलथापालथ होत आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्याची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वरिष्ठ पातळीवर बदल केले आहेत.गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवून त्याजागी कोकणचे नेते सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पडझड काही प्रमाणात थांबेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांत असणारी नाराजी दूर करण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांची समजूत काढून त्यांना सन्मानाने पक्षात आणणे हे प्रदेशाध्यक्ष तटकरेंसमोर महत्त्वाचे काम आहे. काही महिन्यांपूर्वी पक्ष सोडलेले कदम हे पक्षाबाहेरच असल्याने त्यांचे व्यक्तीगत आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. कदम यांच्याबाबत पक्षाने निवडणुकीपूर्वी स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून गांभिर्याने विचार केला नाही, तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण व दापोली या विधानसभेच्या चार जागा पक्षाच्या हातून जाण्याची शक्यता अधिक आहे. दोन महिन्यांपूर्वी रायगडमधून खासदारकी लढविलेल्या कदम यांनी कोणाचेही पाठबळ नसताना गुहागरमधून १२००० मते घेतली आहेत.माजी आमदार कदम गेली ४० वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. जिल्ह्यात त्यांचे व्यक्तीगत संबंध आहेत. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी मजबूत केली. परंतु, कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. ते जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत तोपर्यंत काम न करण्याची घोषणा करुन कदम यांनी पक्षत्याग केला होता. तटकरे व कदम यांचे मित्रत्त्वाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणती तडजोड होईल, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, कदम यांना दूर ठेवणे आज तरी राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नाही. (प्रतिनिधी)