शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

राष्ट्रवादीची तयारी आता सेनेला झटका देण्याची

By admin | Updated: July 4, 2017 19:13 IST

दक्षिण रत्नाागिरीत सेनेला तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच

 प्रकाश वराडकर/आॅनलाईन

लोकमत रत्नागिरी, दि. 0४ : आमदार भास्कर जाधव व संजय कदम यांनी गावागावात राष्ट्रवादी कॉँग्रेसची चांगली बांधणी केली. त्याद्वारे गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरीतील सेनेची तटबंदी मोडीत काढली. आता दक्षिण रत्नागिरीतही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मजबूत पक्षबांधणी करावी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेला ‘जोर का झटका’ देण्यास तयार राहावे, असा सूर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा मेळाव्यात आळवला गेला. यातून दक्षिण रत्नाागिरीत सेनेला आपली तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच राष्ट्रवादीने दिले आहे.

येथे अजित यशवंतराव यांचे नेतृत्व आक्रमकतेने पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरीत खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर या पाच तालुक्यांचा समावेश होतो. तर दक्षिण रत्नागिरीत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर हे चार तालुके येतात. गेल्या दोन दशकांमधील जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता, शिवसेना हा पक्ष जिल्ह्यात सर्वाधिक ताकद असलेला आहे. तळागाळात या पक्षाच्या शाखा आणि कार्यकर्ते आहेत. नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये सेवाभाव आणि आक्रमकता आहे. त्या बळावरच जिल्ह्यात शिवसेनेचे ‘स्ट्रॉँग नेटवर्क’ आहे.

गेल्या पंधरा वर्षांमधील उत्तर रत्नागिरीतील सेनेच्या मजबूत गडाचे बुरुज कदम, जाधव यांच्यामुळे ढासळले. सेनेच्या मुशीतच तयार झालेले हे नेते आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्ह्यातील ‘स्ट्रॉँगमन’ ठरले आहेत. शिवसेनेतील पक्षबांधणीच्या अनुभवाचा फायदा आता त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसला होताना दिसून येत आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळाव्यात आवर्जून सांगितले.

या पार्श्वभूमीवर आमदार जाधव व कदम यांच्या संघटन कौशल्याचा लाभ दक्षिण रत्नागिरीतही पक्षसंघटनेला व्हावा, असे पक्षनेतृत्वाचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच लांजा-राजापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे अजित यशवंतराव यांना दक्षिण रत्नागिरीच्या संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या चार तालुक्यात आक्रमकतेने पुढे आणण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर उमेश शेट्ये, बशीर मुर्तुझा यांच्याकडेही मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

उत्तर रत्नागिरीत आक्रमक नेतृत्व करणाऱ्या आमदार भास्कर जाधव, संजय कदमांप्रमाणेच दक्षिण रत्नागिरीलाही कणखर, आक्रमक नेतृत्व पक्षाने द्यावे, ही येथील कार्यकर्त्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी अजित यशवंतराव यांच्या नावाला अनेकांकडून हिरवा कंदील दाखवला जात होता.