शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची तयारी आता सेनेला झटका देण्याची

By admin | Updated: July 4, 2017 19:13 IST

दक्षिण रत्नाागिरीत सेनेला तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच

 प्रकाश वराडकर/आॅनलाईन

लोकमत रत्नागिरी, दि. 0४ : आमदार भास्कर जाधव व संजय कदम यांनी गावागावात राष्ट्रवादी कॉँग्रेसची चांगली बांधणी केली. त्याद्वारे गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरीतील सेनेची तटबंदी मोडीत काढली. आता दक्षिण रत्नागिरीतही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मजबूत पक्षबांधणी करावी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेला ‘जोर का झटका’ देण्यास तयार राहावे, असा सूर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा मेळाव्यात आळवला गेला. यातून दक्षिण रत्नाागिरीत सेनेला आपली तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच राष्ट्रवादीने दिले आहे.

येथे अजित यशवंतराव यांचे नेतृत्व आक्रमकतेने पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरीत खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर या पाच तालुक्यांचा समावेश होतो. तर दक्षिण रत्नागिरीत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर हे चार तालुके येतात. गेल्या दोन दशकांमधील जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता, शिवसेना हा पक्ष जिल्ह्यात सर्वाधिक ताकद असलेला आहे. तळागाळात या पक्षाच्या शाखा आणि कार्यकर्ते आहेत. नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये सेवाभाव आणि आक्रमकता आहे. त्या बळावरच जिल्ह्यात शिवसेनेचे ‘स्ट्रॉँग नेटवर्क’ आहे.

गेल्या पंधरा वर्षांमधील उत्तर रत्नागिरीतील सेनेच्या मजबूत गडाचे बुरुज कदम, जाधव यांच्यामुळे ढासळले. सेनेच्या मुशीतच तयार झालेले हे नेते आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्ह्यातील ‘स्ट्रॉँगमन’ ठरले आहेत. शिवसेनेतील पक्षबांधणीच्या अनुभवाचा फायदा आता त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसला होताना दिसून येत आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळाव्यात आवर्जून सांगितले.

या पार्श्वभूमीवर आमदार जाधव व कदम यांच्या संघटन कौशल्याचा लाभ दक्षिण रत्नागिरीतही पक्षसंघटनेला व्हावा, असे पक्षनेतृत्वाचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच लांजा-राजापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे अजित यशवंतराव यांना दक्षिण रत्नागिरीच्या संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या चार तालुक्यात आक्रमकतेने पुढे आणण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर उमेश शेट्ये, बशीर मुर्तुझा यांच्याकडेही मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

उत्तर रत्नागिरीत आक्रमक नेतृत्व करणाऱ्या आमदार भास्कर जाधव, संजय कदमांप्रमाणेच दक्षिण रत्नागिरीलाही कणखर, आक्रमक नेतृत्व पक्षाने द्यावे, ही येथील कार्यकर्त्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी अजित यशवंतराव यांच्या नावाला अनेकांकडून हिरवा कंदील दाखवला जात होता.