शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राष्ट्रवादीची तयारी आता सेनेला झटका देण्याची

By admin | Updated: July 4, 2017 19:13 IST

दक्षिण रत्नाागिरीत सेनेला तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच

 प्रकाश वराडकर/आॅनलाईन

लोकमत रत्नागिरी, दि. 0४ : आमदार भास्कर जाधव व संजय कदम यांनी गावागावात राष्ट्रवादी कॉँग्रेसची चांगली बांधणी केली. त्याद्वारे गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरीतील सेनेची तटबंदी मोडीत काढली. आता दक्षिण रत्नागिरीतही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मजबूत पक्षबांधणी करावी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेला ‘जोर का झटका’ देण्यास तयार राहावे, असा सूर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा मेळाव्यात आळवला गेला. यातून दक्षिण रत्नाागिरीत सेनेला आपली तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच राष्ट्रवादीने दिले आहे.

येथे अजित यशवंतराव यांचे नेतृत्व आक्रमकतेने पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरीत खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर या पाच तालुक्यांचा समावेश होतो. तर दक्षिण रत्नागिरीत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर हे चार तालुके येतात. गेल्या दोन दशकांमधील जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता, शिवसेना हा पक्ष जिल्ह्यात सर्वाधिक ताकद असलेला आहे. तळागाळात या पक्षाच्या शाखा आणि कार्यकर्ते आहेत. नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये सेवाभाव आणि आक्रमकता आहे. त्या बळावरच जिल्ह्यात शिवसेनेचे ‘स्ट्रॉँग नेटवर्क’ आहे.

गेल्या पंधरा वर्षांमधील उत्तर रत्नागिरीतील सेनेच्या मजबूत गडाचे बुरुज कदम, जाधव यांच्यामुळे ढासळले. सेनेच्या मुशीतच तयार झालेले हे नेते आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्ह्यातील ‘स्ट्रॉँगमन’ ठरले आहेत. शिवसेनेतील पक्षबांधणीच्या अनुभवाचा फायदा आता त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसला होताना दिसून येत आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळाव्यात आवर्जून सांगितले.

या पार्श्वभूमीवर आमदार जाधव व कदम यांच्या संघटन कौशल्याचा लाभ दक्षिण रत्नागिरीतही पक्षसंघटनेला व्हावा, असे पक्षनेतृत्वाचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच लांजा-राजापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे अजित यशवंतराव यांना दक्षिण रत्नागिरीच्या संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या चार तालुक्यात आक्रमकतेने पुढे आणण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर उमेश शेट्ये, बशीर मुर्तुझा यांच्याकडेही मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

उत्तर रत्नागिरीत आक्रमक नेतृत्व करणाऱ्या आमदार भास्कर जाधव, संजय कदमांप्रमाणेच दक्षिण रत्नागिरीलाही कणखर, आक्रमक नेतृत्व पक्षाने द्यावे, ही येथील कार्यकर्त्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी अजित यशवंतराव यांच्या नावाला अनेकांकडून हिरवा कंदील दाखवला जात होता.