शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

मंडणगड तालुका : तहसीलदारांना निवेदन सादर

मंडणगड : तालुक्यातील ग्राहकांवर वीज करांचा वाढलेला अधिभार, शेतीपंप वीज जोडणी अभावी सर्वसामान्य शेतकऱ्याची झालेली गैरसोय, वाढती महागाई, रेशनवरुन गायब झालेले धान्य, संगणकीकृत सातबारा मोहिमेमुळे नागरिकांच्या वाढलेल्या अडचणी अशा विविध समस्यांसंदर्भात आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी कार्यालयासमोरुन या मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर सरकारचे विरोधात घोषणा देत मंडणगड शहरातून हा मोर्चा भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोर धडकला. यानंतर तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान वीज वितरण कंपनी अस्थापनेचे प्रमुख अभियंता तहसील कार्यालयात चर्चेसाठी वेळेवर उपस्थित न राहिल्याने मोर्चेकरी व सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खोळंबा झाला़ दूरध्वनीवर वारंवार संपर्क केल्यानंतर सुमारे एक तासाचे विलंबाने महावितरणचे प्रमुख अधिकारी माने हे तहसील कार्यालयात हजर झाले. तालुक्यातील शेतीपंपाचे प्रलंबित वीज जोडण्यांचे समस्येवर दीर्घकाळ वादंग झाल्याने सरतेशेवटी एक महिन्यात सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे जुजबी आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा समाप्त झाला. राष्ट्रवादीच्या या मोर्चाला जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, मनोज घागरुम, सुरेश मोरे, अनिल रटाटे, वैभव कोकाटे, राकेश साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी) आघाडीतील घटक पक्षांची मोर्चाला अनुपस्थिती विविध मागण्यांसाठी मंडणगड येथे काढण्यात आलेला मोर्चा हा राष्ट्रवादी, काँग्रेस व रिपाइं या महाआघाडीचे माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्यावतीने मंगळवारी स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज मोर्चात महाआघाडीतील काँग्रेस आय व रिपाइं या घटक पक्षांची अनुपस्थिती जाणवली. या संदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत मोर्चाचा विषय हा आघाडीतील घटकपक्षांसमोर संयुक्तपणे बोर्डावर ठेवण्यात आलेला नव्हता, हा विषय आमच्यासमोर आयत्यावेळी ठेवण्यात आला असल्याचा खुलासा केला़ रिपाइंची या विषया संदर्भातील अधिकृत प्रतिक्रिया कळलेली नाही़ नाराज तालुकाध्यक्ष राहिले अनुपस्थित गेले कित्येक दिवस सक्रीय राजकारणापासून दूर असेलेली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम जनतेच्या प्रश्नासाठी आयोजित केलेल्या मोर्चासही अनुपस्थित राहिल्याने विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले असून, पक्षाचे कार्यपध्दतीवर ते नाराज असल्याचे बोलले जात आहे़