शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘फाईट’

By admin | Updated: February 19, 2017 00:30 IST

बहुजन पक्षामुळे समीकरणे बदलणार? : जालगाव, हर्णै, पालगड गण सर्वाधिक लक्षवेधी

दापोली : दापोली तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, सेनेच्या या बालेकिल्ल्यातील जालगाव, हर्णै, पालगड या मतदार संघात राष्ट्रवादीने जोरदार ‘फाईट’ दिल्याने सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी जोरदार लढत देणार आहे. यामुळे पंचायत समितीची एकहाती सत्ता मिळविणे सेनेसाठी डोईजड बनले आहे. त्यातच तालुक्यात स्वाभिमानी बहुजन पक्षाने मुसंडी मारल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालगड पंचायत समिती गण सेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्यावेळी या गणातून सेनेच्या संजना गुजर निवडून आल्या होत्या. मात्र, यावेळी पालगड गणातून सेनेचे राजेंद्र फणसे, राष्ट्रवादीचे राजेश गुजर रिंगणात आहेत. सेनेच्या या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीने जोरदार लढत दिल्याने सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा जोरदार लढतीची शक्यता आहे. हा मतदारसंघ सेनेचा असला, तरीही या मतदार संघात राष्ट्रवादी अलिकडच्या काळात चांगलीच फोफावतेय. पंचायत समितीच्या जालगाव गणातून यावेळी भाजप, सेनेचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम ईदाते, सेनेचे माजी सरपंच मनोज भांबीड, राष्ट्रवादीचे अरुण पालटे, स्वाभिमानीचे सुभाष धोपट यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. सर्वात लक्षवेधी मतदारसंघ म्हणून जालगावकडे पाहिले जात आहे. हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु, या मतदार संघात भाजप व स्वाभिमानी बहुजन संघ यांनी लढत रंगतदार केली आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच स्वाभिमानी पक्षाने आपला उमेदवार उभा केल्याने सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.दापोली तालुका सेनेचा बालेकिल्ला असला तरी हर्णै पंचायत समिती गण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीचे उपतालुकाध्यक्ष रऊफ हजवाणे, सेनेतर्फे हर्णै ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश पवार, भाजपतर्फे पांडुरंग पावसे निवडणूक रिंगणात आहेत. हर्णै गट हा राष्ट्रवादीचा गट म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीसमोर हा गट राखण्याचे आव्हान आहे. मात्र, या मतदारसंघात भाजप, सेना राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत.राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच झगडावे लागत असून, हर्णै गणात खरी लढत राष्ट्रवादीचे रऊफ हजवाणे विरुद्ध सेनेचे महेश पवार यांच्यात होणार आहे. हर्णै गाव आमदार संजय कदम यांनी दत्तक घेतल्यामुळे राष्ट्रवादीला हा गड आपल्याकडे राखण्याची आशा आहे. मात्र, सेना - भाजप सत्तेत असल्याने या निवडणुकीत हर्णै जेटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. (प्रतिनिधी)विशेष लक्षआमदार संजय कदम यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातले आहे. यावेळी ही निवडणूक सोपी जाईलच असे नाही. तुल्यबळ उमेदवारामुळे रंगत वाढली आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.