शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी चे आव्हान ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:01 IST

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडले आहे. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जिल्ह्यात आतापासूनच घुमू लागले आहेत. जिल्ह्यावरील सेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण अशा तीन जागांवर विजय मिळाला होता. दापोली व गुहागर या दोन्ही मतदारसंघांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने कब्जा केला होता. दापोलीची जागा सेनानेते अनंत गीते व रामदास कदम यांच्यातील राजकीय हेवे-दाव्यांमुळे सेनेच्या हातून गेल्यावेळी निसटली. तेथे राष्टÑवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली. रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत , चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण व राजापूरमध्ये राजन साळवी यांनी सेनेचे गड त्यावेळी राखले.विधानसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा सेनेच्या विजयासाठी एकमेकांचे विरोधक असलेले गीते-रामदास कदम एकत्र आले आहेत. उत्तर रत्नागिरीत त्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रत्नागिरी व लांजा - राजापूर हे मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आधी समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी राजापूरची विधानसभा जागा धोक्यात येईल, हे लक्षात आल्याने यु टर्न घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प लादल्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा यु टर्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित कालावधीसाठी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.दुसरीकडे गुहागर व दापोली हे मतदारसंघ राखण्याबरोबरच चिपळूण मतदारसंघही ताब्यात घेण्याचा चंग राष्टÑवादी कॉँग्रेसने बांधला आहे. रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघात सेनेची वीण घट्ट बांधली आहे. तरीही येथे भाजपकडून प्रसाद लाड किंवा अन्य तगडा उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीचे राजकारण रंगले आहे.भाजपच्या रणनीतीवर लक्षजिल्ह्यात भाजप कमकुवत असला तरी राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजप नेमकी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच २०१९ची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.