शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

बांदरी विभागाला नवसंजीवनी?

By admin | Updated: January 15, 2016 00:47 IST

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : महाळुंगे येथे जलोपासना अभियान

खेड : अठरा गाव बांदरी विभागातील महाळुंगे गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ जानेवारीला भेट देणार आहेत. येथील जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खेड येथील एमबीए महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम यांच्या स्वत:च्या मालकीच्या ६ एकर जागेत उभारण्यात आलेल्या फार्म हाऊसमध्ये ग्रामीण पर्यटन सुरू करण्याच्या कामालाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार आहे.खेड तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या महाळुंगेसारख्या गावात बहुउद्देशीय योजनांचा प्रथमच प्रारंभ मुख्यमंत्री यांच्याहस्ते होत आहे. हा मार्ग असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ४० गावांतील पर्यटन आणि कृषी विकासाला यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा त्यामुळे महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस १७ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता महाळुंगे येथे उपस्थित राहणार आहेत. गावातील केदारनाथ मंदिराजवळ यावेळी खास जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानासह आंबवली महाळुंगे ग्रामीण पर्यटन कार्याला त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने या कोकण जलपरिक्रमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली.जलपरिक्रमा आणि जलचेतना परिषदेमुळे येथील अठरा गाव बांदरी विभागासह तालुक्यातील कृषी आणि पर्यटन क्षेत्रही विकसित होणार आहे. या भागातील डोंगराळ भागात असलेल्या धनगरवाड्यांसह डोंगरातील अनेक गावांना वारंवार भासणारी पाणीटंचाई तसेच नदीकिनारी पारंपरिक पध्दतीने करीत असलेल्या शेतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने या जलचेतना परिषदेचा आणि जलपरिक्रमा योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे. तसेच त्यामुळे रोजगारासह सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते आणि प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रसिंह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी)पर्यटनाची माहिती : १९९५ नंतर मुख्यमंत्री ग्रामीण भागात१९९५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या कामांसाठी भेटी दिल्या होत्या़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९५नंतर तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. ग्रामीण भागाच्या पर्यटन विभागाची माहिती यानिमित्त घराघरात पोहोचणार आहे़ पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशातच कोकण हा जलसमृध्द भाग आहे. तरीही कोकणात भीषण पाणीटंचाई जाणवते. याच पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन केल्यास कोकणातील गावागावामध्ये जलसमृध्दी येऊ शकते.