शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

राष्ट्रवादी बेफाम, तर महायुती विभागली

By admin | Updated: September 23, 2014 23:59 IST

इस्लामपूर मतदारसंघ : जयंत पाटील यांच्यासह शेट्टींनाही फटका

अशोक पाटील - इस्लामपूर -ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या ताकदीवर इस्लामपूर मतदरसंघातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते बेफाम झाले आहेत. राजकारणाच्या आडाने गुंडगिरी, खासगी सावकारी, वाळू तस्करी, भूखंड घोटाळे यामध्ये ते तरबेज बनल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची प्रतिमा चांगली असतानाही त्यांचा जनमताचा आलेख खालावत असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे वाळवा-शिराळा तालुक्यात ऊस उत्पादकांच्या रूपाने खा. राजू शेट्टींच्या मागे एकवटलेली ताकद विधानसभेला मात्र विभागली आहे. जयंत पाटील यांनी राजकारणात चाणक्य नीतीचा वापर केला आहे. दिलीपतात्या पाटील, माणिकराव पाटील, विनायकराव पाटील, पी. आर. पाटील या निष्ठावंतांसह पूर्वीचे विरोधक विलासराव शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांना राष्ट्रवादीत जखडून ठेवण्यासाठी राज्यपातळीवर आणि राजारामबापू उद्योग समूहात त्यांना मानाचे स्थान दिले. त्यामुळे तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नाराज आहेत. जयंतरावांच्या ताकदीवर मतदरसंघातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते बेफाम झाले आहेत. राजकारणाच्या आडाने गुंडगिरी, खासगी सावकारी, वाळू तस्करी, भूखंड घोटाळे यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे कार्यकर्तेच सांगत आहेत. जयंतरावांची वैयक्तिक पातळीवर ताकद आहे. याचा गैरफायदा कार्यकर्ते उठवत आहेत. कारण स्थानिक पातळीवरील राजकारण करताना या नेत्यांना कार्यकर्त्यांविना काहीही करता येत नाही. जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी कंबर कसली आहे. परंतु महायुतीतच गद्दारांची संख्या वाढू लागली आहे.स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील यांच्यामध्ये मतभेद होते, ते आता चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभेला शेट्टी, तर विधानसभेला जयंत पाटील, हा ऊस उत्पादकांचा नारा याही निवडणुकीत कायम आहे. मोदी लाटेवर स्वार होऊन मुंबईची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधकांच्या नाकापर्यंत पाणी आले आहे. जयंतरावांविरोधात शड्डू ठोकण्याचा आव आणला जात आहे. नानासाहेब महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. महाडिक यांच्याच पायात पाय घालण्यासाठी विरोधकांत गद्दारीचे पेव फुटले आहे.