शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

जिल्ह्यात राबविणार ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’, ‘कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’, ‘कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेशही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ होत चालली आहे. रुग्ण संख्या कमी होत नसल्याचे चित्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. त्यातच कोरोनामुळे मृत्यू दरामध्येही वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने ही नवीन मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व वेळेवर उपचार करणे, हा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये गृहभेटी देण्यासाठी एक पथक तयार करण्यात येणार असून, त्याचे पाच सदस्य असणार आहेत. त्यामध्ये ग्राम कृती दल, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात येणार आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातही घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी आरोग्य पथक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये नगरसेवक हे पथक अध्यक्ष असणार असून, वॉर्ड मेंबर, वसुली कर्मचारी, सफाई मुकादम, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आदींचा समावेश शहरी भागासाठी असणार आहे.

हे पथक दररोज कमीत कमी ५० घरांना भेटी देणार आहे. या भेटीदरम्यान घरातील सदस्यांची नाव नोंदणी, ताप, सर्दी, खोकला, आदी लक्षणांची माहिती घेणे, घरातील सर्व सदस्यांची तापमापकाने तापमान घेणे, व्यक्तींना सहा मिनिटे चालविणे, त्यांचे पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन प्रमाण तपासणे, तसेच एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन लेवल ९५ पेक्षा कमी असल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून घेणे व त्याचा पाठपुरावा करणे.

या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रानाही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आयसोलेशन सेंटरची स्थापना करावी. त्यासाठी एखादा हॉल, हायस्कूल, शाळा, आदी ठिकाणी सर्व सुविधा विचारात घेऊन आयसोलेशन सेंटर सुरू करावे. हे पथक कोरोनाबाबत जनजागृतीही करणार आहे.