शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

मुरूडमध्ये समुद्राचे अतिक्रमण

By admin | Updated: July 17, 2016 01:05 IST

दापोली तालुका : नारळ - पोफळीच्या बागेत पाणी शिरून नुकसान

दापोली : दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर गेल्या ३ वर्षांपासून समुद्राच्या उधाणाचे पाणी येत असून, येथील ग्रामस्थांच्या नारळ-पोफळीच्या बागांमध्ये हे पाणी येऊन नुकसान होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, ढिम्म महसूल विभागाकडून या नुकसानाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुरूड समुद्रकिनाऱ्यावर गेल्या तीन वर्षांपासून वरची पाखाडी, खालची पाखाडी आणि मुरूड बीच येथे असलेल्या नारळ-पोफळीच्या बागांमध्ये समुद्राच्या लाटा अतिक्रमण करत आहेत. समुद्राचे पाणी थेट बागांमध्ये येत असल्याने बागेबाहेरील सुरूची झाडे, माड कोलमडून जमीनदोस्त होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. तालुक्यातील पाळंदे, कर्दे, आंजर्ले येथे समुद्रकिनारी बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून समुद्राच्या अतिक्रमणाचा सामना करणाऱ्या मुरूड समुद्रकिनाऱ्यावर बंधारा उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी येथील बागायतदार ग्रामस्थांचे प्रत्येकवर्षी माड उन्मळून पडत असून, आर्थिक फटका बसत आहे. महसूल विभागाकडून या नुकसानाचा पंचनामा करण्यातदेखील चालढकल करण्यात येत आहे. महसूल विभाग बंदर विभागाकडे आणि बंदर विभाग महसूल विभागाकडे बोट दाखवत असल्याने नुकसान होऊनही ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे. मुरूड समुद्रकिनाऱ्यावर तातडीने बंधाऱ्याची उभारणी करून होणारे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. यामुळे तातडीने येथे बंधारा उभारण्याची मागणी बागायतदार व ग्रामस्थ प्रबोध जोशी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)तीन वर्षे समस्या : महसूलचे दुर्लक्षगेल्या तीन वर्षापासून या भागात समुद्राच्या पाण्याचे अतिक्रमण होत असून, समुद्रकिनाऱ्यावरील बागांचे नुकसान होत आहे. या नुकसानाची नोंद होतच नसल्याने या ग्रामस्थांना नुकसान भरपाईदेखील मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नुकसान सहन करावे लागत आहे.